इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाणी सातत्याने वाढत असल्याने आळंदी परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 250 नागरिक विविध ठिकाणी अडकले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
रावेत येथे ट्रक आडवा उभा करून एक्सप्रेस वेवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद.
राज्यभरातील पूरपरिस्थिती बघता अनेक आमदार विधिमंडळात वेळेत पोहचू शकणार नाहीत. त्यामुळे आजचे कामकाज काही वेळासाठी पुढे ढकलावे अशी मागणी भाजप आमदार समीर मेघे यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस सुरू असून ताथवडे परिसरात घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
अलिबाग- रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली आहे. ताम्हिणी घाट खचल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आली आहे. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
MSRDC ने एक्सवर पोस्ट करत नागरिकांना आवाहन केलं आहे. "दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे.
पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती", असं म्हणत प्रवास टाळण्याचं आवाहन MSRDC कडून करण्यात आलं आहे.
राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पार्श्वभीमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबईला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड,मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मागील चार दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच आता मुंबईतील मानखुर्दमध्ये दु:खद दुर्घटना घडली आहे. तीन मजली चाळीचा भाग मुसळधार पावसामुळे कोसळल्याने 6 लहान मुलं, एका महिलेसह 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून आणखी काही लोक जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.