महाराष्ट्र

मूड महाराष्ट्राचा : फडणवीस-अजितदादांचा शपथविधी पुन्हा नकोच!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होत आहेत. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात दोघांनीही राजीनामा दिला. मात्र अध्येमध्ये सातत्याने हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत असतात. मात्र हे दोन्ही पक्ष आणि फडणवीस-अजितदादांचा शपथविधी पुन्हा नकोच असा मूड महाराष्ट्राचा आहे.

महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणूका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल 'सकाळ-साम'ने केलेल्या सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे.

महाराष्ट्रातील तब्बल ७०.२ टक्के जनतेने भाजप-राष्ट्रवादीने पुन्हा एकत्र येवून सरकार स्थापन करु नये असा कौल दिला आहे. अवघ्या १०.२ टक्के लोकांना अशा आघाडीची अपेक्षा आहे. सर्व्हेक्षणात एकाच मुद्द्यावर इतके प्रचंड जनमत या एकाच प्रश्नाच्या उत्तरात आहे. त्यामुळे एकूणच भाजप-राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि नेत्यांना मतदारांनी त्यांची भविष्यातील दिशा स्पष्ट सांगितली आहे, असे म्हणता येईल.

भाजप-शिवसेना पुन्हा युती देखील पुन्हा नकोच....

याच सर्वेक्षणात ५५ टक्के जनतेने शिवसेना-भाजपनेही पुन्हा एकत्र येऊ नये, असा कौल आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्ष आणि सेना-भाजपमधील गटांचाही सहभाही असू शकतो. त्यामुळे हे प्रमाण बहुसंख्य आहे. तर दूसऱ्या बाजूला एकत्र आले पाहिजे, हे केवळ २८.५ टक्के मतदारांना वाटते. ही आकडेवारी म्हणजे शिवसेनेला महाविकास आघाडीतील आपला खुंटा बळकट करण्याची संधी म्हणून पाहाता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT