शासकीय वसतिगृह प्रवेशावरून नवा वाद उदभवण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. उपवर्गीकरण लागू केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. समाजकल्याण विभागाच्या जाहिरातीत एससी प्रवर्गाचे स्वतंत्र उपविभाजन करण्यात आलं आहे. जाहिरातीत प्रवर्गाचा कॉलममध्ये 'मांग', 'मेहतर' आणि 'इतर एससी' असा उल्लेख असल्यानं सामाजिक संघटनांचा तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्यात एससी उपवर्गीकरणाचा मुद्दा पेटलेला असतानाच नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता आहे. जाहिरातीमागील कायदेशीर आधार सार्वजनिक करण्याची मागणी.
कोकणात जाणाऱ्या मार्गावर इंदापुर आणि माणगावमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तीन किलो मिटर पर्यंत वाहनांच्या रांगा आहेत. उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरु होण्याच्या कालावधील शेवटचा विकएन्ड असल्याने कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे
जळगाव विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी माघार घेतली आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील मुचुंडी येथे प्रशासकीय यंत्रणेने राष्ट्रीय गुहागर मार्गावरील दलित कुटुंबाची दुकाने सील केली आहेत. याच निषेधार्थ राष्ट्रीय दलित पँथर सेने तर्फे जतच्या प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. राजकीय द्वेषा पोटी दलित कुटुंबावर अन्याय केला जात आहे. त्याचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर येत्या दोन दिवसात योग्य तोडगा नाही निघाला तर मुचंडी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
भिवंडी पालिकेत स्वच्छता कॅबिनमध्ये गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मॅजिक पेनच्या माध्यमातून बोगस स्वाक्षरी करून हजेरी लावणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पालिका आयुक्तांच्या आदेशाने उपायुक्त विक्रम दराडे यांनी निलंबित केले आहे. संतोष जाधव असे निलंबित आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे. भिवंडीत नगरसेवक स्वच्छतेच्या प्रश्नावर आग्रही आहेत. प्रभाग क्रमांक 14चे नगरसेवक अब्दुल रहमान खान उर्फ सद्दाम भाई यांनी याबाबत आपल्या प्रभागातील स्वच्छता कॅबिनमध्ये पाळत ठेवून तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आमदार अंबादास दानवे यांचे सत्ताधारी पक्षावर शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला. महाविकास आघाडी महाराष्ट्रातील सर्व जागा ताकदीने लढत आहे. धाराशिव-लातूर-बीडची जागाही आम्ही पूर्ण ताकदीने लढत आहोत. मात्र सत्ताधारी पक्षाकडून निवडणुकीत नवीन तंत्र वापरले जात असून, इलेक्शन होण्याऐवजी 'सिलेक्शन' व्हावे यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोप दानवे यांनी केला.
राष्ट्रीय अन्न योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी बनावट लाभार्थी शोधण्याच्या दृष्टीने शासनाच्या 'मिशन सुधार' मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 23,574 रेशनकार्डाची पडताळणी होणार आहे. यापैकी दुबार असलेली 1553 आणि आधार क्रमांक नसलेली अशी 476 मिळून एकूण 5729 रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहेत.
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक मॅनेज करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यावर आमच्याकडे काम आहे, विकास आहे, समोरच्या उमेदवाराकडे बोलण्यासारखं काहीच नाही, म्हणून काहीही बोलतात, असा हल्लाबोल भाजपच्या बसवराज पाटील यांनी चढवला. त्याला काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ओपन चॅलेंज केले.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीवर शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ठाम आहेत. कालपासून आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. रात्री त्यांची आरोग्य तपासणी केली. सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान सरकारने मागणी मान्य केल्याशिवाय आंदोलनातून मागे हटणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. आंदोलनाला राज्यभरातील शेतकरी व विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
पाच महिन्यांनंतर 15 जूनपासून श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भिमाशंकरमध्ये दाखल होत असून विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांचा, सुरक्षा व्यवस्थेचा आणि भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा सखोल आढावा घेणार आहेत.
एल निनोमुळे यंदा राज्यात सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडण्याचा तसेच आॅगस्ट-सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण कमी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात 22 जूननंतर मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेपरफुटीनंतर 21 जून रोजी होत असलेल्या नीट यूजी 2026 परीक्षेच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्ष संस्थेने घेतला आहे. विद्यार्थ्य़ांना 15 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. याशिवाय परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.