NEET पेपर लीक प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणांच्या मागणीसाठी सलग 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. परंतु अभिजीत दिपके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत कॉकरोच जनता पार्टीचं जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन असंच सुरू राहील, असे म्हटले आहे. अभिजीत दिपकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. सोनम सर यांनी 26 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलं आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. सर, तुमच्या धैर्यासाठी आणि त्यागासाठी खूप खूप धन्यवाद, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.
एकीकडे नीट परीक्षेतील पेपरफुटीवरून राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनतापार्टीकडून तीव्र आंदोलन आणि देशभरात संतापाची लाट पसरली असतानाच दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीचं सत्र सुरूच आहे. आता उत्तराखंडमधील टेक्निकल विद्यापीठात बीटेक थर्ड इयरचे दोन पेपर फुटले आहेत. परीक्षेपूर्वीच पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे लक्षात येताच परीक्षा रद्द करण्यात आली असून, या प्रकरणी एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार आषाढ सरी बरसत आहेत. 11 टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू असल्याने, 90 टक्के पाणीसाठा स्थिर ठेऊन प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासात घाटघर परिसरात 300, तर रतनवाडी परिसरात 248 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगर दऱ्यांवरील धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. पाणलोट क्षेत्रात धो-धो पाऊस आणि वारे वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भंडारदरा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या क्राॅक्रोच जनता पक्ष आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता तीव्र स्वरूप धारण केले आहे. या आंदोलनाची व्याप्ती देशभर वाढविण्यासाठी आज देशव्यापी निदर्शनांची हाक दिली आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान युवकांच्या मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
जालन्याच्या महापौरांनी बजावलेली शिस्तभंगाची नोटीस अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनी डस्टबिनमध्ये टाकली आहे. जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी महापौर वंदना मगरे यांनी भाजपच्या दोन, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या एका आणि एका अपक्ष नगरसेवकाला शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर महापौर वंदना मगरे यांनी बजावलेल्या शिस्तभंगाच्या नोटीसा रद्द केल्या आहेत.
नीट-यूजी परीक्षेछी प्रश्नपत्रिका फुटल्याने दिल्लीत विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पेपरफुटी प्रकरणांमध्ये जलदगतीने निर्णय होऊन, त्यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.