‘ऑपरेशन आमिस्ताद’ अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला भारताने पाठवलेले मदत साहित्य, वैद्यकीय उपकरणे आणि फिरते रुग्णालय पोहोचले आहे. या मानवतावादी मदतीमुळे व्हेनेझुएलातील मदतकार्याला बळ मिळेल, असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. जयशंकर यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, भारताची मदत व्हेनेझुएलात पोहोचली आहे. फिरते रुग्णालय, मदत साहित्य, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांमुळे भूकंपानंतर सुरू असलेल्या मदतकार्याला गती मिळेल. जयशंकर यांनी या मदतीचे काही फोटोही शेअर केले आहेत.
काँग्रेसचे प्रतिनिधीमंडळ अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. पण, चढाव्यातील चोरीमध्ये गुंतलेल्या भाजप सरकारने उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय अन् प्रतिनिधीमंडळातील इतर सदस्यांना हाऊस अरेस्ट केलं आहे. अखेर या चढावा चोरांना प्रभू श्रीरामांच्या भक्तांची इतकी भीती का वाटत आहे? आता भाजप-आरएसएसच ठरवणार का की कोण प्रभूंचे दर्शन घेईल आणि कोण नाही? कोट्यवधी देशवासियांच्या भावनांचा सौदा करणाऱ्या या भाजप-आरएसएसच्या चढावा चोरांनी लक्षात ठेवावे. भगवान रामांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. तुमची ही खालच्या पातळीची कृती आम्हाला रोखू शकणार नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ‘‘सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना हे सूत्र लागू होणार नाही, असे मंडळाकडून सांगण्यात आले. याशिवाय सातवी ते नववीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन (दहावीत गेल्यावर) तिसऱ्या भाषेची बोर्डाची परीक्षा देण्यापासून सवलत देण्यात आली आहे.
मेघालयमध्ये आजपासून (ता. 30) मतदारयादीच्या विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. निवडणूक आयोगाने सन 2005ची मतदारयादी आधारभूत मानली असून, या यादीत नाव असलेल्या मतदारांना स्वगणनेचे अर्ज वितरित करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत सर्व मतदारसंघांतील घरांना भेटी देतील.
‘नीट-यूजी 2026’ पेपरफुटी प्रकरणातील 10 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत दिल्ली न्यायालयाने सोमवारी 11 जुलैपर्यंत वाढ केली. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) सुरू आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 13 आरोपींपैकी 10 जणांची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपल्याने त्यांना ‘राऊज् एव्हेन्यू’ न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल, धनंजय लोखंडे, तेजस शाह, शुभम खैरनार, मनीषा वाघमारे, मनीषा हवालदार आणि डॉ. मनोज शिरूरे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली.
राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी आता फक्त एकच दिवसाची मुदत उरली आहे.. आज शेवटची मुदत आहे
राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीची अर्थात SIR मोहीम आजपासून सुरू होत आहे. निवडणुक कर्मचारी घरोघरी गणना अर्जाचे वाटप करणार आहेत.
नाशिकच्या TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. पीडित तरुणीचे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात उघड झाले आहे. धर्मांतरासाठी वर्षभरापासून आरोपींनी नियोजनबद्ध कट रचल्याचा दावा एसआयटीकडून न्यायालयात केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यासह राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. पुढील ४८ तास मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन दिवस पुण्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.