Mahayuti Government News : महायुतीची सत्ता येऊन सहा महिन्याचा कालवाधी होत आला. विरोधकांकडे पुरेस संख्याबळ नसल्याने सरकारपुढे काही अडचण नसल्याचे चित्र आहे. मात्र, बाहेरील संकटांपेक्षा आतील संकटांचा सामना महायुती सरकारला आता करावा लागतोय.
महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले मात्र अधिकार मिळाले नसल्याची तक्रार राज्यमंत्र्यांकडून करण्यात येत आहेत. कॅबिनेट मंत्र्यांकडून आपले अधिकार राज्यामंत्र्यांना देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याची बोलले जात आहे.
राज्यमंत्र्यांनी आपली तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना काही अधिकार दिले आहेत. मात्र, इतर खात्यांमध्ये राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकार दिले नसल्याची चर्चा आहे.
राज्यमंत्र्यांना अधिकार कॅबिनेट मंत्री देत नसल्याने थेट सरकारच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्था वाढत असून पावसाळी अधिवेशनाच्या आधी यावर तोडगा निघाला नाही तर ही अस्वस्था आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जात नसल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ज्यमंत्र्यांचे काय घेऊन बसला आहात?. राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांना तरी कोणते अधिकार दिले आहेत. राज्यात आणि केंद्रात सगळीकडे मंत्र्यांना काहीही अधिकार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.