आरपीआय (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक प्रवासाचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी कारचा ताफा बाजूला ठेवत बुलेटवरून विधानभवनात प्रवेश केला. त्यांच्या या साध्या आणि वेगळ्या प्रवासाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली.
हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या संशयीत आरोपीचा सीसीटिव्हीसमोर आला आहे. . संशयीत आरोपी इलेक्ट्रिक स्कुटीवरून आला.. त्यानंतर त्यानं अतिदक्षता विभागाच्या बाजुला असणाऱ्या पुरुष स्वच्छता गृहात हा बॉम्ब ठेवला. दरम्यान सीसीटिव्हीमध्ये संशयिताचा चेहरा किंवा गाडीचा नंबर प्लेट स्पष्ट पणे दिसत नसल्यानेता पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचं मोठे आव्हान आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झीशान अख्तर नेपाळमध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांना अख्तरच्या ठिकाणाची माहिती मिळाली असून लवकरच त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्कामावरून वाद झाला होता. जागा अपुरी असल्याच्या विचाराने दुसरीकडे मुक्काम होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आळंदी देवस्थानने परंपरेनुसार भवानी पेठेतचं पालखीचा मुक्काम होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देवस्थानने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे. पवनराजे आणि त्यांचे चालक समद काझी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात होणार आहे. या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जण आरोपी आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचं विविध वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. यंदा कुंभमेळ्यासाठी नवे बौध चिन्ह निश्चित करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ३ हजार ५७४.९३ लक्ष रुपयाच्या पुरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे. पुणे जिल्हातील भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०२५, १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६, व १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीचा संभाव्य पाणी टंचाई त्रैमासिक कृती आराखडा १ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रान्वये सन २०२५-२६ साठी ३ हजार ५६४.४० लक्ष रुपयाचा मंजूर करण्यात आला होता, त्यानंतरच्या कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक पार पाडल्या. नवनिर्वाचित सदस्यांनी पाणी टंचाई निवारणाच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या होत्या, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ७ मे २०२६रोजी पुरक टंचाई आराखड्यास मंजूरी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.