Sanjay Gandhi National Park : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही वनअधिकाऱ्यांनी मद्यपान केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत सोमवारपासून चर्चा सुरू आहे. या चर्चे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि पंडित नेहरूंनी वंदे मातरमचे तुकडे केले, विश्वासघात केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. मोदींच्या याच वक्तव्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. ''वंदे मातरम्'ला दीडशे वर्षे झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने एक ‘उत्सव’ म्हणजे ‘इव्हेंट’ करायचे ठरवले; पण हा खेळ पंतप्रधान मोदी व भाजपच्या अंगलट आल्याचे दिसते. ‘वंदे मातरम्’वर लोकसभेत चर्चा सुरू करून चूक केली असे मोदी यांना आता वाटत असेल. भाजपच्या तथाकथित राष्ट्रवादाचा मुखवटाच ओरबाडून काढला. मुळात भाजप किंवा त्यांच्या संघ परिवाराचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी कोणताच संबंध नाही. या लोकांच्या अंगावर स्वातंत्र्य लढ्यात साधा ओरखडाही उमटला नाही आणि हे ढोंगी राष्ट्रवाद, देशभक्ती, ‘वंदे मातरम्’वर देशाला ज्ञान देतात हा विनोद आहे, अशा शब्दात सामनातून मोदींसह भाजप आणि आरएसएसवर टीका करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणात आता अमुलाग्रह बदल करून राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा घाट सरकार करीत असल्याचा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं केला आहे. महाराष्ट्रातील 18000 पेक्षा अधिक शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा देखील या फेडरेशनने केला आहे. राज्यातील 65 हजार सरकारी शाळा दत्तक योजनेच्या नावाखाली भांडवलदारांच्या ताब्यात दिल्या जाणार असून यामुळे सुमारे 2 लाख गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती देखील ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने व्यक्त केली आहे.
अंबादास दानवे यांच्या विरोधात रायगडमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिली. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भातील चुकीचा व्हिडीओ सोसळ मीडियावर शेअर करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दानवेंवर केणी यांनी केला आहे.
मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे नागपूरकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मात्र, रेल्वे विभागाने घसरलेले डब्बे रुळावर ठेवले आहेत. परंतू रुळ बदलणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पुन्हा काही वेळ रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.
भाजप, शिवसेनेला प्रत्येकी ३३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागांचा प्रस्ताव. शहरातील दोन्ही आमदारांकडून प्रत्येक मतदार संघात दोन जागांचा दावा. भाजप, शिवसेनेकडून वरिष्ठ नेत्यांना प्रस्ताव. आता राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागेचा प्रस्ताव असल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.