कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत 81 जागांसाठी 546 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 205 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. 205 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता फक्त 546 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
मागठाणेत महायुतीचा पहिला मेळावा पार पडला. शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि रिपाईचे कार्यकर्त्यांची मेळाव्याला उपस्थित होते. महायुतीकडून प्रभाग तीनमध्ये प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार असा विश्वास उमेदवार प्रकाश दरेकर यांनी व्यक्त केला. मोदींचे पंतप्रधान म्हणून असणारे काम, राज्यात फडणवीसांचे काम आणि परिसरात केलेले काम याच्या जोरावर विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाल्याचा आरोप केला. शहरात लुटारुंची टोळी दिवसाढवळ्या वावरतेय, असे अजित पवार म्हणाले. याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार यांनी विकास कामे केल्याचे अजित पवारांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीत एकीकडे काँग्रेस व वंचित आघाडीची युती झाली आहे. दोन्ही पक्षाने जागा वाटून घेतल्या आहेत. मात्र आता वंचितच्या मागणीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. पाच जागेवर वंचितने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला आहे.
महापालिका निवडणुकीत महायुतीने गुलाल उधळला आहे. मतदानापूर्वीचे महायुतीने विजयी उमेदवारांचे अर्धशतक काढले आहे. कल्याण डोंबिवली, जळगाव, धुळे, पुणे, अहिल्यानगर, पनवेल आदी महापालिकांमध्ये महायुतीचे ५० हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवलीतील चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचे तब्बल १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. भाजपने मतदानाआधीच विरोधकांवर मात केली आहे.
पुण्यातील शिंदे गटाचे बंडखोर उद्धव कांबळे यांनी आता अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्यावर एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप होता.उमेदवाराकडून अर्ज मागे, उद्धव कांबळे यांनी पुण्यातील प्रभाग क्रमांक ३४ मधून उमेदवारी अर्ज भरला होता. पुण्यात शिंदे गटालाही काही ठिकाणी बंडखोरी थोपवण्यास यश आल्याचे पाहायला मिळत आहे. पण त्याआधी एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप कांबेळांनी फेटाळला. मी फॉर्म अनवधानाने फाडला. पण मी खाल्ला नाही', असे उद्धव कांबळेंनी सांगितले.
महानगरपालिका भाजप अधिकृत उमेदवार बाळा शिरसाठ आणि देवानंद बिरारी यांच्यात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली आहे. नाशिकच्या सिडको महापालिका कार्यात हा वाद झाला असून, प्रभाग 31 मधून वंदना बिरारी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र भाजपाने बाळा शिरसाठ यांना उमेदवारी दिल्याने हा वाद उफाळून आला आहे. आज वंदना बिरारी आणि पती देवानंद बिरारी माघार घेण्यासाठी आले असता दोघांमधील वादावादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
भाजपने नागपूरमध्ये एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा असंतोष उसळून आला आहे. प्रभाग क्रमांक तेरामधील भाजपने किसन गावंडे आणि विजय होले या दोघांना एबी फॉर्म दिला होता. यापैकी होले यांचा अर्ज स्वीकृत झाला आहे. गावंडे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी नेते दबाव टाकत असल्याचे बघून कार्यकर्त्यांनी त्यांना घरात कोंडून ठेवले आहे. दरम्यान, आमदार परिणय फुके यांच्या मध्यस्थीनंतर गावंडे यांना घरातून मुक्त करण्यात आले ते उमेदवारी अर्ज मागे घेण्यास रवाना झाले आहेत.
कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे नऊ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. या निवडणुकीत तब्बल ६९१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे सुर्वे हे महायुतीच्या प्रचारात सक्रीय नाहीत. सुर्वे हे नाॅट रिचेबल असल्याची माहिती आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुर्वेंवर नाराज असल्याची चर्चा असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपा पक्षात तब्बल 80 जणांची बंडखोरी केली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज बंडोबांनी माघार घ्यावी यासाठी आमदार संजय केणेकर आणि शिरीष बोराळकर यांच्याकडून भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
मीरा-भाईंदरमधील भाजप उमेदवार वर्षा भानुशाली यांची उमेदवारी अडचणित येण्याची शक्यता आहे. अर्जांच्या छाननीच्या वेळी भानुशाली यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी हा आक्षेप फेटाळुन लावला आहे. मात्र या निर्णयाला ठाणे जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.
'राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी. नुसत्या सभा गाजवून लोकांची पोटं भरत नाहीत, आणि समस्या सुटत नाहीत. आम्ही आठवड्याला ६००-७०० लोकांना भेटतो, सुख-दुःखात धावून जातो, म्हणूनच मुंबईकरांच्या हृदयात आम्हीच वसतो. राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही, आणि उद्धवजींना हे गणित कसं काय दिसत नाही ? ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केलं, त्यांचं राजकारण आता संपत आलं. तुम्ही कितीही करा युती, पण मुंबईत पेटणार नाही तुमची पणती,' अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भाजप समर्थक, हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या टोकाच्या विरोधामुळे अखेर पूजा मोरे यांना पुणे महानगरपालिकेसाठी दाखल केलेली उमेदवारी मागे घ्यावी लागली. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुजा मोरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'तुम्ही वर्षाला एक पक्ष बदलताय. पूजा मोरेंनी काय व्यक्तव्य केली आहेत ते महाराष्ट्राने पाहिलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेपासून, संभाजी ब्रिगेड ते स्वराज्य पक्षापर्यंत फिरून झाल्यानंतर कमाळावर निवडणूक लढायला निघालाय? आधी यांना ओबीसीमधून उमेदवारी पाहिजे होती. पण ती मिळाली नाही म्हणून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र जनता सजग आहे.', असं म्हणत त्यांनी मोरे यांच्यावर निशाणा साधला.
नागपुरमधील काँग्रेस नेते संजय सरायकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत संजय सरकार यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरात बंडखोरांच्या भूमिकेकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.