शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला महापालिका निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे सुर्वे हे महायुतीच्या प्रचारात सक्रीय नाहीत. सुर्वे हे नाॅट रिचेबल असल्याची माहिती आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुर्वेंवर नाराज असल्याची चर्चा असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपा पक्षात तब्बल 80 जणांची बंडखोरी केली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज बंडोबांनी माघार घ्यावी यासाठी आमदार संजय केणेकर आणि शिरीष बोराळकर यांच्याकडून भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
मीरा-भाईंदरमधील भाजप उमेदवार वर्षा भानुशाली यांची उमेदवारी अडचणित येण्याची शक्यता आहे. अर्जांच्या छाननीच्या वेळी भानुशाली यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी हा आक्षेप फेटाळुन लावला आहे. मात्र या निर्णयाला ठाणे जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.
'राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी. नुसत्या सभा गाजवून लोकांची पोटं भरत नाहीत, आणि समस्या सुटत नाहीत. आम्ही आठवड्याला ६००-७०० लोकांना भेटतो, सुख-दुःखात धावून जातो, म्हणूनच मुंबईकरांच्या हृदयात आम्हीच वसतो. राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही, आणि उद्धवजींना हे गणित कसं काय दिसत नाही ? ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केलं, त्यांचं राजकारण आता संपत आलं. तुम्ही कितीही करा युती, पण मुंबईत पेटणार नाही तुमची पणती,' अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भाजप समर्थक, हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या टोकाच्या विरोधामुळे अखेर पूजा मोरे यांना पुणे महानगरपालिकेसाठी दाखल केलेली उमेदवारी मागे घ्यावी लागली. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुजा मोरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'तुम्ही वर्षाला एक पक्ष बदलताय. पूजा मोरेंनी काय व्यक्तव्य केली आहेत ते महाराष्ट्राने पाहिलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेपासून, संभाजी ब्रिगेड ते स्वराज्य पक्षापर्यंत फिरून झाल्यानंतर कमाळावर निवडणूक लढायला निघालाय? आधी यांना ओबीसीमधून उमेदवारी पाहिजे होती. पण ती मिळाली नाही म्हणून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र जनता सजग आहे.', असं म्हणत त्यांनी मोरे यांच्यावर निशाणा साधला.
नागपुरमधील काँग्रेस नेते संजय सरायकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत संजय सरकार यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरात बंडखोरांच्या भूमिकेकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.