Minister Abdul Sattar News, Parbhani
Minister Abdul Sattar News, Parbhani Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हीच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची इच्छा..

सरकारनामा ब्युरो

परभणी : कमी कालावधीत येणाऱ्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणाचा शेतकऱ्यांमध्ये अधिक प्रसार होणे आवश्यक आहे. कारण कमी कालावधीची पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास, (Farmers) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकेल, असा विश्वास कृषि मंत्री अब्दूल सत्तार (Abdul Sattar) यांनी व्यक्त केला. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, अशी इच्छा असल्याचेही ते म्हणाले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात आयोजित शेतकऱ्यांना बियांणे वाटप कार्यक्रमात सत्तार बोलत होते. (Parbhani) कुलगुरु, शास्त्रज्ञ आणि कृषि अधिकारी यांनी काम करतांना शेतकऱ्यास केंद्रबिंदू समजून कामे करावीत. तसेच विद्यापीठाने मागील दहा वर्षात कोण-कोणते वाण, तंत्रज्ञान विकसीत केले, कोणत्या वर्षी विकसीत केले, कोणत्या पिकांचे केले याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी.

शेतकऱ्यांना जमीन, हवामान बदल यासह पेरेणीची वेळ, वातावरण, हवामान याची तंतोतंत माहिती दिल्यास, जुन्या पध्दतीची शेती सोडून, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व नवीन शेती पध्दती अवलंबण्यास मदत होईल. आज जे नव-नवीन कृषि विषयक तंत्रज्ञान विकसीत झाले आहे, त्या पध्दतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे, असा दावा देखील कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.

विद्यापीठाने अनेक कमी खर्चीक तंत्रज्ञान विकसित केले आहेत, पिकांची अनेक चांगली वाण देखील विकसित केली आहेत. हे सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहचले पाहिजे. तसेच पिकांवर येणाऱ्या नवनवीन कीड-रोगांच्या प्रतिबंधासाठी आणि यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक संशोधन केले पाहिजे. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व अडी-अडचणी जाणुन घेण्यासाठी राज्यात माझा एक दिवस बळीराजा सोबत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत शेतकऱ्यांसोबत लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी दिवसभर राहणार असून शेतकऱ्यांची दिनचर्या जाणुन घेतली जात आहे. या दरम्यान त्यांच्या समस्या व अडी-अडचणी जाणुन घेवून होणाऱ्या आत्महत्याची कारणे देखील जाणुन घेण्यात येत असल्याचे सत्तार यांनी सांगितले. बळीराजाची खरी परिस्थिती लक्षात यावी हाच या मोहिमे मागचा हेतू आहे.

शेतकऱ्यांनी पिक कापणी केल्यास त्यांना योग्य भाव मिळत नाही. ज्या गावात गेले त्या गावात ग्रामसभा घेवून शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी आणि प्रश्न समजवून घ्यायचे आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेवून धोरण तयार करण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना काय मदत करेल आणि शेतकरी बांधव कसा सक्षम होईल यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिलेले आहेत.

त्यामुळे राज्यभर विविध जिल्ह्यात दौरे करुन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत-बांधावर जाऊन शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी व प्रश्न समजवून घेतले जातायेत असेही सत्तार यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान महोदयांची इच्छा आहे की, राज्यातील शेतकरी हा दीड ते दोन पटीने उत्पन्न घेणारा तयार व्हावा. परंतू यासाठी त्यास नवीन तंत्रज्ञानाचे, चांगल्या दर्जाचे, चांगल्या उगमशक्तीचे संकरीत बियाणे द्यावे लागतील.

शेतकऱ्यांचे काही तक्रार किंवा प्रश्न असल्यास त्याकरीता जिल्ह्यात वॉर रुमची सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचेही सत्तार यांनी स्पष्ट केले. शेतकरी हा आस्मानी संकटात सापडला असून त्यास नुकसान भरपाई म्हणून २७ लाख हेक्टर जमीनवरील नुकसान भरपाईसाठी ३ हजार ३०१ कोटी रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर महिन्यात वितरीत करण्यात आल्याचेही सत्तार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT