Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

सत्तार म्हणतात...टीईटी घोटाळा हे फक्त मीडिया ट्रायल; तो विषय आता संपला

सरकारनामा ब्यूरो

Abdul Sattar : जालना : टीईटी (TET) घोटाळा हे फक्त मीडिया ट्रायल होते.. तो विषय आता संपलेला आहे, असे वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आहे. जालन्यात ध्वजारोहणानंतर सत्तार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

टीईटी म्हणजेच शिक्षक भरती घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. अपात्र ठरवलेले असतांना सत्तार यांच्या मुली त्यांच्या सिल्लोड येथील शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होत्या आणि पगार उचलत होत्या, अशी माहिती समोर आली होती. मात्र, हे आरोप सत्तार यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर आता मंत्री झाल्यानंतर सत्तार यांनी मोठे विधान करत तो विषय फक्त मीडिया ट्रायल होता असे म्हटले आहे.

त्याच बरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी खातेवाटपावरुन शिंदे गटाला खोचक टोला लगावला होता. भाजपने शिंदे गटाला डाझी आणि डोंगर दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर बोलताना सत्तार म्हणाले, विरोधकांनी जसे चष्मे लावले आहे, तसेच त्यांना दिसते. आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 18 -18 तास काम करतात. मात्र, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किती तास काम करायचे हे मला माहित नाही, असे अर्जुन खोतकर यांनी म्हणाले. दरम्यान, सत्तार यांच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT