Ambadas Danve News  Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : भाजपने बहीण-भावामध्ये फूट पाडली ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

Sambhajinagar : " शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार आल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याची पदे अजित पवार गटाकडे गेली आहेत.सरकारमधील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. भाजपमधील नाराजीच भाजपला भारी जाईल," असे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले. राज्यातील सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणाबाबत त्यांनी भाष्य केले. राष्ट्रवादीतील फुटीवर अप्रत्यक्षपणे ते म्हणाले, "भाजपने बहीण-भावामध्ये फूट पाडली," (Latest Marathi News)

अंबादास दानवे म्हणाले, "सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणं-घेणं नाही. सरकार काही करेल की नाही ही शंका आहे. हे सरकार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय देणार नाही. पावसामुळे शेततकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, कृत्रिम पाऊस होत नाही. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे," ( Ambadas Danve News )

"आगामी निवडणुकीसाठी सरकारची तयारी सुरु आहे. जनतेच्या कामाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. शासन त्यांच्या दारी गेले असते तर मंत्रालयात आंदोलन करण्याची वेळ आली नसती," असा टोला दानवेंनी लगावला. ते संभाजीनगर येथे बोलत होते.

अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून निर्णय घेत असल्याची टीका विरोधक करीत आहेत. त्यावर दानवे म्हणाले, "कोण कुणाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करीत आहेत, हे कळत नाही. अजितदादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच निर्णय घेतात, त्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना नसते," "राज्यात सरकार दंगली घडवीत आहेत. आतापर्यंत ज्या दंगली झाल्या यात किती कारवाई केली ते सरकारने सांगावे. सरकारचे आमदार तलवार काढतात, धमक्या देतात," अशी टीका त्यांनी केली.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT