Cm Uddhav Thackeray-Aimim-Bjp
Cm Uddhav Thackeray-Aimim-Bjp Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : `स्वाभीमान` सभेआधीच मुख्यमंत्र्यांवर भाजप, एमआयएमकडून प्रश्नांचा पाऊस..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर स्वाभीमान सभा होणार आहे.(Aunragabad) या सभेवरून आता राजकारण सुरू झाले असून एमआयएम आणि भाजपने या सभेआधीच मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा पाऊस पाडला आहे. एमआयएमचे (Aimim) खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना पंधरा प्रश्न तर भाजपने तेरा प्रश्न विचारले असून सभेत उत्तर देणार का ? असा सवाल देखील केला आहे.

१ मे महाराष्ट्रदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर रेकाॅर्डब्रेक सभा घेत मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थीत केला होता. (Bjp) तर त्यानंतर २३ मे रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील पाणीप्रश्नावर जल आक्रोश मोर्चा काढत शिवसेना व मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या टीका आणि आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या (Shivsena) वतीने मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज ठाकेर आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देणारी उद्धव ठाकरे यांची ही उत्तर सभा असणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन आणि आगामी महापालिकेच्या प्रचाराचा नारळ या निमित्ताने शिवसेनेकडून फोडला जाणार असल्याचेही बोलले जाते. शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शनांची जोरदार तयारी सुरू असतांना विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि एमआयएमने देखील शिवसेनेला खिंडीत गाठण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील पाणी, उद्योग, बेरोजगारी, रस्ते, विमानांची कनेक्टीव्हीटी, पर्यटन, शेतीविषयक तब्बल १५ प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत. सभेत राजकीय भाषण न करता मुख्यमंत्र्यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन विकासावर बोलावे, असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले आहे. तर एमआयएमच्याच पावलावर पाऊल ठेवत आज भाजपने देखील मुख्यमंत्र्यांना शहरातील विकासा संदर्भात तेरा प्रश्न विचारले आहेत.

यात प्रामुख्याने शहरातील नागरिकांना मुबलक पाणी कधी मिळणार, जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत संपुर्ण पाणीपट्टी माफ करणार का ? पाणीपट्टीत ५० टक्के कपात केल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी करणार? जलवाहिनीचे पाईप तयार करणाऱ्या कंपनीच्या कामाला वेग देणार का? औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? आदी प्रश्न उपस्थितीत करण्यात आले आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून भाजप-एमआयएमच्या या प्रश्नांची उत्तरं देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT