Aurangabad Congress
Aurangabad Congress Sarkarnama
मराठवाडा

वाढलेल्या महागाई दरांचे कॉंग्रेस जनतेला देणार आकडे

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : वाढत्या महागाईच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान राज्यव्यापी जनजागरण अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात कॉंग्रेसच्या काळातील जीवनावश्‍यक वस्तू, इंधनाचे दर किती होते? भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून त्यात किती वाढ झाली, याची माहिती जनतेला दिली जाणार असल्याचे निरीक्षक आमदार शिरिष चौधरी, मुजाहेद खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाढत्या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. कॉंग्रेसने महागाईच्या विरोधात वारंवार आंदोलने केली, पण केंद्रातील भाजप सरकार दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे जनतेत जाऊन आता जनजागृती करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आहे.

त्याअंतर्गत औरंगाबाद शहर व जिल्ह्यात १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पदयात्रा काढून इतर उपक्रम राबवून सरकारच्या विरोधात आवाज उठविला जाणार आहे. अभियानाच्या निमित्ताने कॉंग्रेसला गांधी टोपीची आठवण झाली आहे. पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या सूचनांमध्ये नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी गांधी टोपी वापरणे बंधनकारक राहिल, अशी अट टाकण्यात आली आहे.

तसेच जिल्ह्यातील नेत्यांनी गाव-खेडे, शहर व तालुक्यातील भेटीचा व मुक्कामाचा कार्यक्रम तयार करावा, सकाळी सहा ते सात यावेळेत प्रभातफेरी काढून जनतेशी संपर्क साधावा, वाढत्या महागाईचे होर्डींग तयार करावेत, अभियान यशस्वी करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT