Uddhav Thackeray-Mp Imtiaz Jalil
Uddhav Thackeray-Mp Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

कोरोनाची अधिकाऱ्यांसोबत बैठक? त्याला महाराष्ट्र आवडतो? एमआयएमकडून खिल्ली

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : देशात, राज्यात आणि शहरात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. संसर्गाचा (Corona) वेग कितीही वाढत असला तरी लाॅकडाऊन नकोच, अशी भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांची आणि सरकारची देखील झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात काही निर्बंध लागू केले.

दोन दिवसांपुर्वीच काय निर्बंध घालायचे ते घाला, पण लाॅकडाऊन सहन करणार नाही, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Mp Imtiaz Jalil) यांनी घेतली होती. परंतु रात्रीची संचारबंदी लावण्याच्या निर्णयाची मात्र त्यांनी खिल्ली उडवली आहे.

`कोरोनाची नुकतीच सर्व उच्च नोकरशहांसोबत सविस्तर बैठक झाली आणि विषाणूने सरकारला स्पष्टपणे सांगितले की तो रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत खूप सक्रिय असतील. या धमकीला उत्तर देताना सरकारने तात्काळ महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू जाहीर केला`, असे ट्विट करत इम्तियाज जलील यांनी सरकारच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात निर्बंध तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने राज्यातील पाच राज्यांच्या निवडणूकीची घोषणा केली यावर देखील त्यांनी टीका केली. इम्तियाज जलील यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे.

`ज्या दिवशी निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले त्या दिवशी महाराष्ट्र पुन्हा सर्व काही बंद करण्याच्या जवळ आला आहे. यापेक्षा मूर्खपणाची गोष्ट काय असू शकते. हा विषाणू राज्य-विशिष्ट आहे आणि त्याला फक्त महाराष्ट्रात फिरायला आवडते. आणखी काही धक्क्यांसाठी सज्ज व्हा`, असा चिमटा देखील त्यांनी ट्विटच्या माध्यमातून काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT