Mp Imtiaz Jalil-Subhash Desai News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil-Subhash Desai News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : माजीमंत्री देसाईंकडून कोट्यावधींचा औद्योगिक जमीन घोटाळा...

सरकारनामा ब्युरो

Aimim News : आघाडी सरकारमधील तत्कालीन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी राज्यात औद्योगिक जमीनींच्या परिवर्तनातून (लॅंड कन्वर्झेशन) कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक एकमेकांच्या आजी-माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली बाहेर काढत आहेत. (Aurangabad) कुणी त्याला लंवगी फटाका तर कुणी बाॅम्ब म्हणत आहे. यावरून अधिवेशनात गदारोळ सुरू असतांनाच इकडे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी राज्याचे माजी उद्योगमंत्री यांच्यावर औद्योगिक जमीन वापराचे उद्देश बदलून तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले असून या प्रकरणांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. इम्तियाज जलील म्हणाले, गेल्या वर्षभरात विशेषतः औरंगाबाद चिकलठाणा एमआयडीसीतील औद्योगिक वापराच्या भुखंडाचा मुळ उद्देश बदलून सबसिडीमध्ये, रोजगार उपलब्ध होणार म्हणून दिलेल्या भुखंडावर निवासी, वाणिज्य वापरासाठी दिले गेले.

प्रत्येकी एका प्लाॅटच्या उद्देश बदलण्यासाठी २ कोटी रुपये घेण्यात आले असून यातून तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी शंभर ते सव्वाशे कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. राज्यात अशा प्रकारचे ३२ हजार एकर औद्योगिक भूखंडांचे उद्देश बदलण्यात आल्याचा दावा देखील इम्तियाज जलील यांनी केला. उद्योगमंत्री म्हणून सुभाष देसाई नवे उद्योग तर शहरात, राज्यात आणू शकले नाही, पण औद्योगिक वापराच्या भुखंडाचे उद्देश बदलून कोट्यावधी रुपये कमावले आहेत.

एमआयडीसीमधून आपण गेल्या वर्षभरातील अशा इंडस्ट्रीयल प्लाॅटची माहिती मागवली होती. आता प्रत्येक प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या आणि ती मान्य करणाऱ्या सरकारने याची देखील चौकशी करावी, अशी अपेक्षा आहे. नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, मंत्री, आमदारांना हा मुद्दा महत्वाचा वाटत असेल तर त्यांनी यावर आवाज उठवला पाहिजे.

एकट्या औरंगाबादमध्ये शंभर-सव्वाशे कोटींचे प्रकरण समोर आले आहे, मग राज्यातील मोठ्या शहरातील एमआयडीसीमधील किती भूखंडांचे उद्देश बदलण्यात आले असतील, याचा अंदाज लावला तर हा घोटाळा एक हजार कोटींच्यावर जाईल. गेल्या दहा-पंधरा वर्षात राज्यातील ३२ हजार एकर इंडस्ट्रीयल भुखंडांचे उद्देश बदलण्यात आले आहेत, यात नारायण राणे, उद्योगमंत्री असतांनांच्या काळातील काही एमआयडीसीतील भुखंडाचा देखील समावेश असल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT