Mp Imtiaz Jalil-Devendra Fadanvis
Mp Imtiaz Jalil-Devendra Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : फडणवीस मोर्चा काढून जनतेच्या दुःखावर राजकारण करत आहेत..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : भाजपकडून पाणी प्रश्नावर २३ मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीत जल आक्रोश मोर्चा काढणार आहे. (Devendra Fadanvis) या मोर्चाची जोरदार तयारी गेल्या आठवड्याभरापासून सुरु आहे. ५० हजार कार्यकर्ते नागरिक या मोर्चात सहभागी होतील असा दावा देखील भाजपकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ((Mp Imtiaz Jalil) यांनी मात्र भाजपवर टीका करणारे ट्विट केले आहे.

औरंगाबादकरांसाठी पाणी प्रश्न हा खूप महत्वाचा आणि किंमती आहे, त्यावर स्वस्त राजकारण करू नका, असा टोला इ्म्तियाज जलील यांनी फडणवीस यांना लगावला आहे. (Aimim) गेली २५ वर्ष महापालिकेवर एकत्रितपणे सत्ता उपभोगलेल्या शिवसेना-भाजपकडून आता पाणी प्रश्नाचे खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा लागली आहे. (Aurangabad)

समांतर जलवाहिनीला विरोध केला नसता तर आज औरंगाबादकरांना पाणी मिळाले असते, अशी टीका करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हे पाप भाजप आणि एमआयएमचेच असल्याचा आरोप केला होता. आता याच पाणी प्रश्नावर भाजपकडून २३ मे रोजी मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू आहे.

या संदर्भातील बातम्यांचा संदर्भ देत इम्तियाज जलील यांनी ट्विट करत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. इम्तियाज जलील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांच्या या मोर्चाने औरंगाबादला पाणी मिळणार असेल तर आम्ही सर्व औरंगाबादकर या मोर्चात सहभागी होणार आहोत. जनतेच्या दुःखाच्या किंमतीवर हे स्वस्त राजकारण करण्याशिवाय दुसरे काही नाही!, असे म्हणत त्यांनी भाजप पाणी प्रश्नावर केवळ राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT