Imtiaz Jalil Reaction On Sambhajinagar News
Imtiaz Jalil Reaction On Sambhajinagar News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil News : नामांतराचा सरकारी निर्णय मान्य नाही, मी औरंगाबादेत जन्मलो, तिथेच मरणार..

सरकारनामा ब्युरो

Aimim : सरकारे येतात आणि जातात, अनेक शहराची, रस्त्यांची बागांची नावे बदलण्याचे निर्णय त्यांच्याकडून घेतले जातात. अशा सरकारी निर्णयांना आमचा कायम विरोध राहिला आहे आणि यापुढेही तो राहील. मी औरंगाबादेत जन्मलो आहे आणि तिथेच मरणार, असे सांगत खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी शहराच्या नामांतराला आपला विरोध असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.

मुंबईतील पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलतांना त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. (Aimim) प्रकरण न्यायालयात असतांना केंद्र सरकार नामांतराचा निर्णय कसे घेऊ शकते? (Mumbai) असा सवाल देखील त्यांनी उपस्थीत केला.

इम्तियाज जलील म्हणाले, नाव बदलली जातील, बोर्ड बदलतील पण इतिहास कसा बदलाल? इतिहास कधीच मिटवता येत नाही. ज्या शहरात माझा जन्म झाला ते औरंगाबाद शहर जगाच्या नकाशावर एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. ती ओळख तुम्ही मिटवू शकत नाही.

नाव बदलून शहरातील परिस्थितीत बदलणार आहे का? लोकांना दररोज पाणी, चांगले रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा मिळणार आहेत का ? त्यामुळे आमचा शहराच्या नामांतराला विरोधच राहील, याचा पुनरुच्चार देखील इम्तियाज जलील यांनी केला.

भाजप अशा नामांतराच्या माध्यमातून घाणेरडे राजकारण करत आहे. त्यांचे हे राजकारणच लोकांसमोर आणण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात ती आपल्याला एकजुटीने पार पाडावी लागले, असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT