Rajesh Tope On ED Action News Sarkarnama
मराठवाडा

Rajesh Tope On ED Action : जयंत पाटील भान ठेवून काम करणारा व चांगले विचार जपणारा नेता

सरकारनामा ब्युरो

Ncp : जयंतराव पाटील यांची ईडी चौकशी म्हणजे चांगला विचार आणि आचार संपविण्याचे षडयंत्र असल्याचे सांगत त्यांच्यावरील कारवाई ही राजकीय द्वेषापोटी करण्यात आली आहे, अशी टीका माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे (Rajesh Tope On ED Action) यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली.

या कारवाईच्या निषेधात मुंबई ईडी कार्यालयाबाहेर तसेच राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन, निदर्शने करण्यात आली होती. ही कारवाई राजकी द्वेषापोटी करण्यात आल्याचा आरोप (Rajesh Tope) राजेश टोपे यांनी केला. या संदर्भात ट्वीट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टोपे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, जयंतराव पाटील (Jayant Patil) हे एक स्वच्छ प्रतिमेचे,अभ्यासू, संयमी व संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. (ED Action) आयुष्यभर सामाजिक भान ठेवून काम करणारा व चांगले विचार जपणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे.

दुर्दैवाने अशा चांगल्या नेत्याची केवळ राजकीय व्देषापोटी ईडीकडून चौकशी होणे, म्हणजे समाजातील लोकशाही मूल्य,चांगला विचार संपविण्याचे, तो दाबून टाकण्याचे षडयंत्र होय. म्हणून मी त्याचा निषेध करीत आहे.

जयंत पाटील यांनी आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी या प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही ईडी'ने चौकशी केली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. राज ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह यामध्ये अनेकांची नावे समोर आली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT