Radhakishan Pathade-Kalyan Kale
Radhakishan Pathade-Kalyan Kale Sarkarnama
मराठवाडा

काळे जमीन वाचवण्यात नाही, विकण्यात पटाईत; बागडेंच्या बचावासाठी माजी सभापती मैदानात

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिन्सी येथील भूखंडांची रजिस्ट्री करून देताना निविदेमधील अटी, शर्तींचे पालन करण्यात आले नाही. (Bjp) न्यायालयाच्या आदेशापूर्वीच केवळ रोडलगतच्या भूखंडाची विक्री का करण्यात आली? असा प्रश्‍न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन पठाडे यांनी केला. डॉ. कल्याण काळे (Congress) जमीन वाचविण्यात नाही तर विक्रीत पटाईत आहेत, असा आरोप पठाडे यांनी केला. (Aurangabad)

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिन्सी येथील जमीन विक्रीवरून कॉंग्रेस-भाजपमध्ये वाद पेटला आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी या जमीन विक्रीत भ्रष्ट्राचार झाला असून, त्यात माजी आमदाराचा हात असल्याचा आरोप विधीमंडळात केला होता.

त्यावर सोमवारी (ता. २१) कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी बाजार समिती भाजपच्या ताब्यात असताना शंभर कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी माजी सभापती राधाकिशन पठाडे यांनी पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, सध्याच्या प्रशासकांनी टेंडर प्रक्रियेमधील कुठल्याही अटी शर्तीचे पालन केलेले नाही. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय २३ ऑक्टोबरला झाला पण त्यापूर्वीच १३ ऑक्टोबर २०२१ ला रजिस्ट्री करून देण्यात आली. सध्या तुकडाबंदीचे आदेश असताना पणन संचालकांची परवानगी न घेता जिन्सीच्या जमिनीचे तुकडे पाडून विक्री करण्यात आली.

फक्त रोडलगतच्या प्लॉटची रजिस्ट्री करून का दिली? असा सवाल पठाडे यांनी केला. यासंदर्भात भाजपनेच नव्हे तर शिवसेनेचे दिलावर बेग तसेच पुंडलीकराव अंभोरे, जयमलसिंग रंधवा, उपमुख्य प्रशासक पांडुरंग तायडे हे ठरावात सूचक आहेत. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी चौकशी समिती नेमली. मात्र डॉ. काळे यांनी या चौकशीला स्थगिती मिळवून घेतली.

चौकशीत ‘दूध का दूध, पाणी का पाणी’होऊ द्या, कशाला घाबरता? असे पठाडे म्हणाले. रॉकेल धारकांना प्लॉट वाटप करताना पाच कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोपही पठाडे यांनी केला. हरिभाऊ बागडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. बागडे यांनी ज्या संस्थेत लक्ष घातले, तिथे कायापालट झाला आहे. बाजार समितीचे आजचे विकासाचे चित्र बागडेंमुळेच आहे.

भाजपच्या कार्यकाळात ८० ते ८५ कोटींचा कामे हाती घेतली होती. त्यातील ७० कोटींची कामे पूर्ण झाली, मग १०० कोटींचा घोटाळा झाला कुठून? असा सवालही पठाडे यांनी केला. काळे यांच्या वडिलांनी बाजार समितीची जमीन विक्री केली होती, आता यांनी केली. जमीन विक्रीची परंपरा ते पाळत आहेत. जमीन विक्रीत ते पटाईत आहेत, असा टोलाही पठाडे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT