Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या भावनांचा उद्रेक; फडणवीसांना दिला मोठा इशारा...

Sunil Balasaheb Dhumal

Maratha Reservation And Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फूट पाडून दुही माजवण्याचा काम सरकारने केले. मला वेळोवेळी मारण्याचा प्रयत्न केला. मी मराठ्यांचा नेता नसून सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा या नात्याने समाजासाठी काम करत आहे. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना मला संपवायचे आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असे गंभीर आरोप करत मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भावनांचा उद्रेक झाला. (Manoj Jarange Vs Devendra Fadnavis)

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) फडणवीसांवर गंभीर आरोप करत माझा बळी घ्यायचा तर घ्या. मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही. आजच सागर बंगल्यावर येतो, घाला मला गोळ्या, असे म्हणत जरांगे बोलता-बोलता जागेवरून उठले आणि स्टेजवरून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी समाजबांधवांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारच्या वतीने अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण दिले. तसेच आंदोलनातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून खोटे आरोप करून मूळ मागणीला फाटा फोडण्याचा प्रयत्न केला. बारस्कारांच्या आरोपांमागे फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, असा आरोपही जरांगे पाटलांनी केला. त्यांनी मनात आणले तर लगेच सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी करू शकतात, मात्र त्यांना तसे करायचे नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीसांवर गंभीर आरोप करता-करता जरांगे पाटलांच्या भावनांचा एकाएकी उद्रेक झाला. फडणवीसांना माझा बळी हवाय. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेत. माझा बळी हावाय ना, तर मीच सागर बंगल्यावर येतो, घ्या माझा बळी. मात्र गोरगरीब मराठ्यांना ओबीसीतून टिकणारे आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असे म्हणत जरांगे, माझी काठी द्या, कमरपट्टा द्या, असे म्हणत झटक्यात जागेवरून उठले.

दरम्यान, समाजबांधवांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते तडक उठून मुंबईला निघण्याच्या तयारीत होते. समाजबांधवांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. शांत करण्याचा प्रयत्न केला. जरांगेंच्या आक्रमक भाषेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर भाजपनेही जरांगेंना प्रत्युत्तर दिले आहे. तर सत्ताधाऱ्यांनी राज्यातील दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT