Maratha Reservation News : अंतरवाली सराटीत उपोषण सोडवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला होता. तसेच त्यांच्यासह सरकराच्या शिष्टमंडळातील चार न्यायाधिशांसह उपस्थित मंत्री आमदारांनी सगेसोयरे अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली होती.
आता मात्र महाजन ही मागणी टिकणार नाही, असे बोलत आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी टिकणारच, असा विश्वासही व्यक्त केला.
बीडमधील शांतता रॅलीत मनोज जरांगेंनी Manoj Jarange ओबीसी नेते छगन भुजबळ, गिरीश महाजन, धनंजय मुंडे यांच्यासह महायुती सरकार आणि विरोधक महाविकास आघाडीवर घणाघात केला. यावेळी त्यांनी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कशी योग्य आहे, हे पटवून देताना ती न्यायालयापुढेही टिकेल असा विश्वासही व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी कारणही दिले.
जरांगे म्हणाले, अंतरवाली सराटीत चार न्यायाधीश आले होते. यांच्यासह आलेले मंत्री, आमदारांच्या उपस्थित सगेसोयऱ्यांची अंमलबाजवणी करण्याचे आश्वासन दिले होते. आता गिरीश महाजन म्हणतात की सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी टिकणार नाही. मात्र ही अंमलबजावणी अजिबात उडणार नाही. ती टिकणार, असे सांगत त्यांनी कारणही स्पष्ट केले.
न्यायाधीश, कायद्याच्या अभ्यासकांनी त्यावेळी सांगितले होते, की सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करू. ही अंमलबजावणी फक्त मराठ्यांसाठी नाही. ओबीसीतील जेवढ्या जाती आहेत, मात्र ज्यांना अद्यापही आरक्षण मिळाले नाही, त्या ओबीसीतील जातीतील लोकांनाही आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे आपली सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीची मागणी टिकणारच आहे. गिरीश महाजन Girish Mahajan ही अंमलबजावणी उडतच नाही, असे आव्हानही जरांगेंनी केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.