manoj jarange patil  sarkaranama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : "...तर मराठा नेत्यांनाही पाडा", जरांगे-पाटलांनी का दिला इशारा?

Akshay Sabale

छगन भुजबळ हे सरकारचे मुकादम आहेत. हे मुकादम मराठा-ओबीसी समाजात भांडणं लावत आहेत. येवल्याच्या मुकादमानं सरकारच्या सांगण्यावरूनच सर्वांत भांडण लावली, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे.

तसेच, मराठा ( Maratha ) समाजाला त्रास देणाऱ्या मराठा नेत्यांनाही पाडा, अशा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे. जरांगे-पाटील यांच्या शांतात रॅलीला हिंगोलीतून शनिवारी सुरूवात झाली. त्यानंतर आज परभणीत शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. तेव्हा, जरांगे-पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "आगामी विधानसभेच्या निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करायचं ठरवले, तर सर्व जाती-धर्मातील उमेदवार देऊ आणि सर्व जाती धर्मातील उपमुख्यमंत्री करू. मला राजकारणात जायचं नाही. माझा जन चळवळीवर विश्वास आहे. तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही आत्महत्या करत असल्यानं मी खचतोय. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे."

"छगन भुजबळ( Chhagan Bhujbal ) हे मुकादम आहेत. तेच सर्व करत आहेत. कुणबी आणि मराठा एक आहेत. भुजबळ यांना सरकार सांगते म्हणून ते आम्हाला त्रास देत आहेत. लक्ष्मण हाकेंना आम्ही विरोधक मानत नाही. हे जे काही घडविण्याचे काम सुरू आहे, त्यामागे भुजबळ आहेत," असा आरोप जरांगे-पाटलांनी केला आहे.

"मी तुमच्यासाठी लढत आहे. माझ्या समाजानं खूप वेदना सहन केल्या आहेत. समाजातील लेकरं मोठी व्हावी, असं मला वाटतंय. मला सरकारनं उघडं पाडण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे मला माझी हात जोडून विनंती आहे. मला उघडं पडू देऊ नका," अशी भावनिक साद मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला घातली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT