Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange: 'जाळपोळ थांबली नाही तर मी वेगळा निर्णय घेणार'; जरांगे पाटलांचे आंदोलकांना शांततेचे आवाहन

Ganesh Thombare

Jalna News: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून, राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे, तर मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खालावली आहे. आता आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत.

आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची तोडफोड करत आग लावण्यात आली. तसेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय आंदोलकांनी पेटवलं. आमदार संदीप क्षीरसागर यांचेही घर आंदोलकांनी पेटवल्याची माहिती समोर आली आहे. बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत मराठा समाजाला शांततेचे आवाहन केले आहे.

तसेच जे लोक हिंसाचार करत आहेत, ते मराठा समाजातील नाहीत. जाळपोळ करू नका, हिंसा करू नका. सत्ताधारी लोकच जाळपोळ करत असल्याची शंका येत असल्याचा संशय या वेळी जरांगे पाटलांनी व्यक्त केला. तसेच जाळपोळ थांबली नाही तर मी वेगळा निर्णय घेणार, असं मोठं विधानही या वेळी त्यांनी केलं.

आंदोलन चिघळण्याचा डाव असल्याचा आरोप करत जाळपोळ करणारे लोकं सामान्य लोकं असतील असे वाटत नाही, तर आज रात्री आणि उद्यापर्यंत मला कोठेही जाळपोळीची घटना ऐकण्यास मिळाली नाही पाहिजे, अन्यथा मी वेगळा निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटलांनी स्पष्ट केले. तसेच समाजाच्या विनंतीनंतर जरांगे पाटलांनी एक ग्लासभर पाणी पिण्यास होकार दिला. मात्र, आपले उपोषण सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT