Raosaheb Danve
Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : राज्याच्या गृहखात्याला फक्त भाजप नेत्यांवर पाळत ठेवण्याचेच काम ?

लक्ष्मण साळुंके

जालना : शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे म्हणून राष्ट्रवादीने अनेकवेळा ठराव घेतले, ६ खासदारांवर कुणी पंतप्रधान होत नाही, हे शरद पवारांना माहीत आहे. (Jalna) युती असेल तर ६ आणि युती नसेल तर ४ खासदार निवडून येतात ही राष्ट्रवादीची परिस्थिती असल्याचा टोला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी लगावला. शिवाय राज्याच्या गृहखात्याला फक्त भाजपच्या नेत्यांवर पाळत ठेवण्याचेच काम आहे? असा चिमटाही त्यांनी काढला. (Marathwada)

भोकरदन येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे यांनी राज्यातील सद्यपरिस्थीतीवरून महाविकास आघाडी सरकार व शरद पवार यांच्यावर टीका केली. दानवे म्हणाले, राज्याकडे कोळशाची ३ हजार कोटींची थकबाकी असूनही केंद्राकडून राज्याला कोळशाची कमी नाही. पण राज्यातच कोळशाची कृत्रीम टंचाई निर्माण करून भ्रष्टाचाराचा प्रयत्न सुरू आहे.

राज्यातील नाराज असलेले किती आमदार आमच्या संपर्कात आहेत हे नाराज आमदारांना भेटल्यानंतर तुम्हाला कळेल,आम्ही सांगितलेल्या गोष्टीवर त्यांच्या पक्षाचा विश्वास बसणार नाही, त्यांना भेटल्यानंतर आमच्यात आणि नाराज आमदारांमध्ये काय बोलणं सुरू आहे हे कळेल, असा सूचक इशाराही दानवे यांनी दिला.

नुसतं राज्यातील गृहखातंच नाही तर राज्य सरकारच संशयाच्या घेऱ्यात अडकल्याचा दावा करतांना दानवे म्हणाले, .सबळ पुरावे देऊनही पोलीस भाजपच्या नेत्यांवर कारवाई करत नसल्याने गृहखाते शिवसेनेकडे देण्याची मागणी शिवसेनेनं केलीय. गृहखाते काय भाजपच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी तयार केलं आहे का? राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येतोय मात्र राज्यात विकासाची घडी विस्कटल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादी मुद्दामहून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा उपद्व्याप करत आहे.

शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी राष्ट्रवादीने अनेक वेळा ठराव घेतले. शरद पवार चांगले नेते आहेत, मात्र युती असेल तर ६ जागा आणि युती नसेल तर ४ जागा त्यांच्या पक्षाला मिळतात. ६ खासदारावर कुणीही पंतप्रधान होत नाही हे शरद पवारांना देखील माहित आहे. तरीही त्यांच्या पक्षाने ठराव घेतला याबाबत अधिक न बोललेलं बरं असा टोलाही दानवे यांनी लगावला.

जयंत पाटील यांनी काल उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेश म्हणजे भारत नव्हे असा टोला भाजपला लगावला होता. यावर देखील दानवे यांनी भाष्य केलं. देशाच्या पंतप्रधानाचा रस्ता हा उत्तर प्रदेशातून जातो,असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच नेते म्हणतात .आता भाजपची सत्ता तिथे आल्याने ही २०२४ च्या निवडणुकीची नांदी असून आज उत्तर प्रदेश आमच्या ताब्यात आल्याने उत्तर प्रदेश म्हणजे देश नाही असं त्यांना वाटत असल्याची टीका दानवे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT