Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : इंटरनेट सेवा बंद करून अंतरवालीत पुन्हा `मारझोड कांड` करायचे आहे का ?

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात विशेषतः मराठवाड्यात हिंसक आंदोलन सुरू आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. (Ambadas Danve News) इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे अनेक अफवा, शंका उपस्थित केल्या जात आहेत. यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.

इंटरनेट सेवा बंद करून अंतरवाली सराटीत पुन्हा मारझोड कांड करायचे आहे का? असा सवाल करत अशा कृतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Shivsena) या संदर्भात समाजमाध्यमावर दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. (Maratha Reservation) जालना आणि बीड येथील इंटरनेट सेवा बंद आहेत. यातून लोकांमध्ये अकारण संभ्रम पसरतो आहे. सरकारने 'जालनावाला' मारझोड कांड यापूर्वी अंतरवाली सराटी गावात केला आहेच. याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना? अशी चिंता लोकांच्या मनात आहे.

त्यामुळे या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत कराव्यात, असे माझे सरकारला आवाहन आहे! अंबादास दानवे यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करत इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची मागणीही केली आहे. (Maharashtra) २९ आॅगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला १ सप्टेंबर रोजी गालबोट लागले होते. जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने पोलिस त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवत असताना विरोध झाला आणि परिस्थिती चिघळली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी आधी लाठीहल्ला आणि नंतर गोळीबार केला. आंदोलकांकडूनही पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत पोलिस आणि आंदोलक अशा दोन्ही बाजूचे शेकडो जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतरच अंतरवालीतील आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटले होते. सध्या मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यातील बेमुदत आंदोलन सुरू केले असून, त्याचा आज आठवा दिवस आहे. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या वाद सुरू आहे. सरकारचा निर्णय जरांगे यांना मान्य नसल्याने त्यांनी आजपासून पाणीही न पिण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये जाळपोळ, शासकीय कार्यालये, अधिकाऱ्यांच्या गाड्या आणि लोकप्रतिनिधींची घरे जाळण्याचा प्रकार घडला. सोशल मीडियामध्ये या घटनांवर प्रतिक्रिया उमटून मोठ्या प्रमाणात अफवाही पसरवल्या जात असल्याचा दावा करत प्रशासनाने बीड, धाराशिव जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता, तर काही काळ संचारबंदीही लागू करण्यात आली होती. मात्र, इंटरनेट सेवा बंद करण्यामागे सरकारचा काही दुसरा हेतू तर नाही ना? अशी शंका अंबादास दानवे यांनी उपस्थितीत केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT