Sangli News, 19 Mar : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभरात महायुतीची ताकदं वाढली आहे. बहुमताचं सरकार असल्यामुळे आता पाच वर्ष हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार यात काहीही शंका नाही, असं नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात बोलताना सांगितलं.
तर दुसरीकडे राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार आल्यापासून महाविकास आघाडी आणि महायुतीपासून लांब गेलेल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं दिसत आहे. यासाठीच अनेकजण आता महायुतीतील मित्र पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदार प्रवेश करण्याच्या तयारीत असून याबाबतची एक बैठक मिरजेत पार पडली आहे.
त्यानुसार विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत एक मेळाव्याचं आयोजन करून दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश केला जाणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे नेते निशिकांत भोसले-पाटील यांनी एका वृत्तपत्राला दिली.
मिरजेत निशिकांत भोसले-पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीला शिराळ्याचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे, जत विधानसभेचे माजी आमदार विलासराव जगताप आणि आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यासह सांगली (Sangli) जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदललं आहे. सध्या शरद पवारांचे शिलेदार आणि सांगलीतील दिग्गज नेते असलेले माजी मंत्री जयंत पाटील देखील महायुतीत येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
मात्र, निवडणुकीनंतर जिल्ह्यातीतल राजकीय अस्वस्थतेचा फायदा आता अजितदादांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत अजितदादांच्या उमेदवारांचा विजय झाला नसला तरी तासगांव आणि इस्लामपूर मतदारसंघात त्यांच्या उमेदावारांना मिळालेली मते लक्षात घेता. त्यांनी पुन्हा एकदा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील चार माजी आमदारांह अनेक दिग्गज नेते देखील पक्षात येणार असल्याचा दावा निशिकांत भोसले-पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सध्या भाजपचं पारडं जाड असलेल्या जिल्ह्यातच अजितदादांनी डाव टाकल्याचं पाहायला मिळत आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.