<div class="paragraphs"><p>Ajit Pawar Statement on Lockdown</p></div>

Ajit Pawar Statement on Lockdown

 

sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाची रूग्णसंख्या वाढल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : कोरोना रूणांची संख्या अशीच वाढायला लागल्यास आपल्याही मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिला आहे.

सातारा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी भवनाच्या नुतनीकरणाची पहाणी आणि उद्‌घाटन केले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची संख्या वाढू लागल्याने तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केलेले आहे, असे नमुद करून ते म्हणाले, कोरोना रूग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. अनेक राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने तेथे लॉकडाउन करण्यात आलेले आहे. तसेच आपण ज्यावेळी जेवताना किंवा चहापान करताना मास्क काढतो, त्यावेळी आपण एकमेकांच्या समोर येतो, त्यावेळी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. (Ajit Pawar Latest Statement on Lockdown)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT