Dhairyashil Mane, Nivedita Mane
Dhairyashil Mane, Nivedita Mane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

खासदारांच्या मातोश्रींना संपर्क प्रमुखांनी घेतले फैलावर : तुम्हाला आता शिवसेना दिसली का?

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पॅनलने खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या नेतृत्वात तीन उमेदवार विजयी झाले. मात्र, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनी सत्ताधारी पॅनलकडून निवडणूक लढली. त्यावरु शिवसैनिक संतप्त झाले आहेत. ज्येष्ठ होता म्हणून शिवसेनेच्या पॅनलमध्ये लढण्याची विनंती केली होती. मात्र, तीन जागा निवडून आल्यानंतर मी शिवसेनेचीच (ShivSena) सांगत आहेत, वहिनीसाहेब निवडणुकीनंतर शिवसेना दिसली का? असा टोला शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी निवेदिता माने यांना लगावला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्जुन आबीटकर यांचा शासकीय विश्रामगृहात सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दुधवडकर बोलत होते. यावेळी दुधवडकर म्हणाले, आजरा कारखान्याला कर्ज देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजेत आणि लढाईच्या वेळी बाजूला जाणाऱ्यांची दयामाया करणार नसल्याचा इशारा त्यांनी संग्राम कुपेकर व सुनील शिंत्रे यांनाही दिला.

या वेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, आपल्यातील बेकीमुळे विधानसभेत पराभव झाला. आगामी काळात दोन्ही काँग्रेसच्या प्रलोभनांना बळी पडू नका, व्यासपीठावरील प्रत्येकाने एक प्रभाग सांभाळला तर महानगर पालिकेवर शिवसेनेची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास 'उत्तर'ची पोटनिवडणूक लढवू, असेही ते म्हणाले.

माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, दोन्ही काँग्रेसचा शिवसेना डॅमेज करण्याचा प्रयत्न असून, आमचा मुख्यमंत्री आहे म्हणून किती सहन करायचे. आता कोणालाही जवळ करु नका, मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची लढाई करायची आहे. आपल्याकडे विकास संस्था किती याचे गणित मांडत बसू नका, प्रचार सुरु करा. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सत्यजित पाटील-सरुडकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सुनील मोदी यांनी आभार मानले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाजूला गेलेल्यांनी पुन्हा यावे, असे सत्यजित पाटील यांनी सांगितले. वैभव उगले, कृष्णात पोवार म्हणाले, माफी मागायची असेल तर त्यांनी 'मातोश्री'वर जावे. पहिल्याच प्रयत्नात क्रांतिसिंह पवार यांनी विरोधकांना घाम फोडला आहे. त्यांनी थांबू नये, एक दिवस क्रांती होईल, असे संजय पवार यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभा आली की, 'मातोश्री'चे उंबरे झिजवायचे, आमच्या रक्तात शिवसेना असल्याचे सांगायचे. गांधीबाबा दिसल्यानंतर वेगळी भूमिका घ्यायची. मग आता तुमच्या रक्तातील शिवसेना कोठे गेली, असा सवाल संजय पवार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT