Eknath Shinde, Shambhuraj Desai
Eknath Shinde, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, आम्ही इतिहास घडवला...

हेमंत पवार

कऱ्हाड : राज्यात, देशात चार महिन्यापुर्वी आम्ही इतिहास घडवला आहे, त्यात माझ्या सर्व ५० सहकाऱ्यांबरोबर शंभूराज देसाई हेही आघाडीवर होते. अन्याय लवकर दुर झाला पाहिजे, लवकर काय ते करा असे ते म्हणायचे. पुढे काय होईल याची पर्वा न करता हिंदुदृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेवुन आम्ही पुढे गेलो. आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. त्याची नोंद राज्यातील सर्व जनतेने घेतली आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मंत्री देसाई यांच्या वाढदिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधला. ते म्हणाले, माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याकडुन शंभूराज यांनी समाजसेवेच धडे घेतले. त्यांच्या आई-वडीलांचे आशिर्वाद घेऊन त्यांनी चांगले काम केले. त्यांचा उत्कृष्ट संसदपटु म्हणुनही गौरविण्यात आले आहे. त्यामुळे लोकांचा नेता म्हणुनही ते नावारुपास आले आहेत. लोकांना मदत करण्यात ते आघाडीवर असतात.

त्यांनी कोरोना, महापुरासह अन्य कोणत्याही संकटात त्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम केले. आम्ही चार महिन्यापुर्वी या राज्यात, देशात इतिहास घडवला आहे, त्यात माझ्या सर्व ५० सहकाऱ्यांबरोबर शंभुराज देसाई आघाडीवर होते. ते अन्याय लवकर दुर झाला पाहिजे, लवकर काय ते करा असे म्हणायचे. जे काही घडले, त्याच्या खोलात मी जात नाही. हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेवुन आम्ही पुढे गेलो.

पुढे काय होईल याची पर्वा आम्ही केली नाही. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहुन परिणामांची पर्वा न करता काम करणारा कार्यकर्ता म्हणुन शंभूराज देसाई हे मला मनापासुन भावतात. त्यामुळे माझे प्रेम त्यांच्यावर आहे. त्यांचेही प्रेम माझ्यावर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही शंभूराज देसाई यांच्यावर प्रेम आहे. मी माझ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मी शंभूराज देसाईंना दिले आहे. आम्ही घेतलेला निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व घटकांसाठी मी, देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्व सहकारी काम करत आहोत. त्याची नोंद राज्यातील सर्व जनतेने घेतली आहे.

शंभूराज देसाईंवर चित्रपट काढु

शंभूराज देसाईंच्या कामास वाटचालीवर आधारीत चित्रपट काढण्यासाठी मी त्यांना चांगला अभिनेता सुट होईल, चांगली भूमिका करेल असे अभिनेता शोधणार आहे, असे सांगुन मुख्यमंत्री म्हणाले, मी धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे हा अनंत दिघे यांच्यावर आधारीत चित्रपट काढला आहे. त्यामुळे मला चित्रपट काढण्याचा अनुभव आहे. त्यात आमदार शहाजीबापु पाटलांनाही रोल द्यावा लागेल, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT