raj thackeray,ramdas padhyes, Dhananjay Munde News Updates, Dhananjay Munde on Raj Thackeray, Dhananjay Munde criticise Raj Thackeray
raj thackeray,ramdas padhyes, Dhananjay Munde News Updates, Dhananjay Munde on Raj Thackeray, Dhananjay Munde criticise Raj Thackeray  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'अर्धवटराव' म्हणत धनंजय मुंडेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

सरकारनामा ब्युरो

सांगली : इस्लामपुरच्या सभेत महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनीही राज ठाकरे (raj thackeray)यांच्यावर निशाणा साधला आहे. (Dhananjay Munde on Raj Thackeray)

मुंडे यांनी राज ठाकरेंना रामदास पाध्ये (ramdas padhyes)यांच्या अर्धवटराव बाहुल्याची उपमा देत त्यांची खिल्ली उडवली आहे. इस्लामपुर येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवार संवाद कार्यक्रमात मुंडे बोलत होते.

ठाण्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या उत्तरसभेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर टीका केली होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, ''राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करीत आहेत. पण पूर्वी शाळेत असताना अर्धवट नावाचे पात्र असायचे.बाहूलाच्या तोंडून बोलायचे हे पात्र. अशा बाहुलच्या तोंडून हे बोलतात.या अर्धवट रावांच्या मागे ईडीचा परिणाम असा झाला की 'लाव रे ती सीडी' म्हणणारे आता सगळे विसरून गेले आहेत. माणस सत्तेत आली की कशी माजतात हे मागच्या पाच वर्ष्यात आपण पाहिले आहे,''

''तुम्हाला जात आठवते. कुणीही जातीचे राजकारण करीत नाही. आम्ही जातीयवादी राजकारण करता म्हणून सांगता, चार खासदार त्यांनी पाठवले. समतेचे राज्य पवार साहेबानी उभं केले आहे. छगन भुजबळ यांना, अमोल मिटकरी, मला अशा अनेक जणांना मोठी पदे दिली. तुम्हाला जणांची ना मनाची लाज वाटली पाहिजे,'' असा शब्दात मुंडेंना राज ठाकरेंना सुनावलं.

''कुठल्या तर कारणाने या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले. जयंत पाटील जलसंपदा मंत्री झाले आहेत.बीडला पाणी दिले तर इकडे ऊस पण तोडू आणि तिकडे ऊस पण पिकवू, असे मुंडे म्हणाले.

''महाराष्ट्रमध्ये राष्ट्रवादी पक्ष्याचा एक दिवस मुख्यमंत्री होणार आहे. राष्ट्रवादीचे शंभरच्यावर आमदार निवडणूक येतील.पण फक्त जयंत पाटील साहेब आपल्या टप्यात निवडणूक घ्यावी. जयंत पाटील आपल्या नेतृत्वात राष्ट्रवादी महाराष्ट्रमध्ये एक नंबरला येईल,'' असे मुंडे म्हणाले.

''पूवी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. हे अर्धवटराव पूर्वी भाजपच्या विरोधात खूप बोलायचे. सीडी लावायचे, त्यांच्या मागे ईडी लागल्यानं ते आता गप्प आहेत, असा टोला मुंडेंनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT