Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रामराजेंनीच माण तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलं...जयकुमार गोरे

Umesh Bambare-Patil

सातारा : सातारा जिल्ह्यातील माजी जलसंपदा मंत्र्यांमुळेच माण तालुका पाण्यापासून वंचित राहिला. त्यांच्या भूमिकेमुळेच माण तालुक्यात राष्ट्रवादीला मान खाली घालावी लागली आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेला, असा सणसणीत आरोप भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी आज माणमधील पाणीप्रश्नासंदर्भात शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना माणच्या मातीबद्दल आणि माणच्या नेत्यांबद्दल कायमच आकस राहिला आहे.

ते ज्यावेळी जलसंपदा मंत्री होते, त्यावेळपासून त्यांनी माण-खटावला पाण्यापासुन वंचित ठेवण्याचं काम केलं. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माण तालुक्यात मान खाली घालावी लागत असेल आणि मतदासंघ राष्ट्रवादीच्या ताब्यातुन गेला असेल तर तो फक्त रामराजेंमुळेच, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

रामराजेंवर माझं जास्तच प्रेम असल्यामुळे मी त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत अजिबातच मदत करणार नाही. उलट भाजपचे सर्वच्या सर्व म्हणजेच पाचही उमेदवार निवडुन येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT