देशभरात गाजणाऱ्या मत चोरीच्या मुद्यावर महाराष्ट्रातही वाद सुरू झाला असून त्यावरून जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.
पाटील यांच्या विधानावर गोपिचंद पडळकर यांनी पलटवार करत त्यांना हिंदू विरोधी म्हणत राजीनाम्याचे आव्हान दिले.
राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मत चोरीवरून सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याने वातावरण आणखी तापले आहे.
Sangli News : सध्या देशभर मत चोरीचा मुद्दा गाजत असून राज्यात देखील आता मत चोरीवरून शंका उपस्थित केली जात आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील आपल्या पदाधिकाऱ्यांना जागृक राहण्याचे निर्देश दिले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांचे नाव न घेत केलेल्या टीकेमुळे आता राजकीय वर्तुळात तापमान वाढले आहे. जयंत पाटील यांनी मत चोरीच्या केलेल्या विधानानंतर आता पडळकर यांनी देखील पटवार केला आहे. जयंत पाटलांना हिंदू विरोधी म्हणत 'हिंमत असेल तर, त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी', असे आव्हान पडळकर यांनी दिले आहे. सांगलीच्या कवठेमंकाळ येथे भाजप किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे यांच्यावतीने आयोजित दोस्ती दहीहंडी सोहळ्याच्यानिमित्ताने उपस्थित असताना पडळकर बोलत होते.
जयंत पाटील यांनी, बऱ्याच चोऱ्या आपल्या ऐकण्यात असून आता मत चोरीचेही ऐकण्यात येत आहे. सभागृहातही ‘हिस्ट्रीशीटर’ (रेकॉर्डवरील गुन्हेगार) बसायला मिळत आहेत. त्यामुळे सभागृहात विचार मांडणेदेखील अवघड झाले आहे. जो राज्यभर लोकप्रिय आहे, तो स्वतःच्या गावातही निवडून येत नाही. इकडे ज्याला गावात कोण विचारत नाही, तो मात्र दुसऱ्याच्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतो. हा प्रकारच नवल असून जरा शंकास्पद असल्याचे जयंत पाटील यांनी पडळकर यांचे नाव न घेता टोला लगावला होता.
त्यावरून पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना, हिंमत असेल तर, जयंत पाटलांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरावे, निवडणूक लढवावी. त्यांच्याविरोधात त्यांच्याच मतदारसंघात मी निवडणूक लढवायला तयार आहे', असे ओपन चॅलेंज पडळकर यांनी दिले होते.
तसेच पडळकर यांनी जयंत पाटील हे हिंदू विरोधी असल्याचा दावा करताना, ते काही आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत आणि निवडणूक लढवणार नाहीत. कारण त्यासाठी हिंमत लागते', जी त्यांच्यात नाही, घणाघात केला.
जयंत पाटील यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून पडळकरांवर केलेल्या बोचऱ्या टीकेला पडळकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. आता त्यांनी केलेल्या जहरी टीकेला जयंत पाटील कसं प्रत्युत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण पडळकर यांनी दिलेल्या ओपन चॅलेंजची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रश्न 1: जयंत पाटील यांनी नेमकं काय विधान केलं?
उत्तर: त्यांनी मत चोरीबाबत भाष्य करत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली.
प्रश्न 2: गोपिचंद पडळकरांची प्रतिक्रिया काय होती?
उत्तर: त्यांनी जयंत पाटील यांना हिंदू विरोधी ठरवले आणि राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान केले.
प्रश्न 3: या वादात राज ठाकरे कुठे आले?
उत्तर: राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मत चोरीबाबत जागृत राहण्याचे निर्देश दिले.
प्रश्न 4: या मत चोरीच्या वादाचा महाराष्ट्र राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: पक्षीय संघर्ष वाढेल, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल आणि राजकीय तापमान आणखी चढेल.
प्रश्न 5: हा वाद नेमका कोणत्या पक्षांमध्ये आहे?
उत्तर: हा वाद राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भाजप यांच्यात आहे, मात्र मनसेही यामध्ये भूमिका मांडताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.