Farmer leader Ajit Navale Latest News
Farmer leader Ajit Navale Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'पराभवाच्या भीतीने भाजपने सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या'

सरकारनामा ब्यूरो

Ajit Navale : राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगितीचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असून राज्य सरकारने या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. यामुळे किसान सभेचे (kisan Sabha) सरचिटणीस डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) यांनी राज्य सरकार आणि भाजपवर (BJP) टीका केली आहे. (Farmer leader Ajit Navale Latest News)

पावसाचे कारण देत राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यभरात वेगवेगळ्या कारणाने अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, आता सुरु असलेल्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतांना आणि अनेक संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ मतदानाची प्रक्रिया बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये अचानक निवडणुका पुढे ढकलल्या ही अत्यंत लोकशाहीविरोधी कृती आहे. हा सत्तेचाही दुरुपयोग असल्याची टीका डॉ. नवले यांनी केली आहे.

डॉ. नवले म्हणाले, राज्यभरातील अनेक सहकारी संस्थांमध्ये भाजपला आपला पराभव दिसत असल्यामुळेच शिंदे-भाजपा सरकारने हा लोकशाही विरोधी निर्णय घेतलेला आहे. किसान सभेच्या वतीने राज्य सरकारच्या या निर्णयाचा आम्ही धिक्कार करत आहोत. राज्य सरकारने तातडीने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा व सहकारी संस्थेत लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन किसान सभेच्या वतीने डॉ. नवले यांनी राज्य सरकारला केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT