Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in Marathi, Agasti Karkhana news
Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in Marathi, Agasti Karkhana news Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मधुकरराव पिचड म्हणाले, अविचारी लोकांनी निवडणूक लादली

शांताराम काळे

अकोले ( जि. अहमदनगर ) - अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) व माजी आमदार वैभव पिचड यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी असे आवाहन केले होते. मात्र महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने निवडणूक बिनविरोध झाली नाही. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय रंग आला आहे. राजूर येथील शेतकरी मेळाव्यात मधुकरराव पिचड यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ( Madhukarrao Pichad said, election was imposed by thoughtless people )

मधुकरराव पिचड म्हणाले की, अगस्ती कारखान्याच्या पेरणीला सुरवात झाली असून, प्रत्येक शेतकरी सभासदाने पेरणीत सहभाग घेऊन शेतकरी विकास मंडळाला पुन्हा संधी द्यावी, असे सांगतानाच, माझ्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक असून, ही माझी नव्हे तर तालुक्याच्या शेतकऱ्यांची परीक्षा असल्याचे प्रतिपादन मधुकरराव पिचड यांनी केले.

ते म्हणाले, की अगस्ती कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, असे मी म्हणत होतो. मात्र, अविचारी मंडळींनी निवडणूक लादली. जनता जनार्दन त्यांचा योग्य न्यायनिवडा करेल. शेतकरी सभासदांवर माझा विश्वास आहे.

वैभव पिचड म्हणाले, की ज्यांनी सत्तेची फळे चाखली, मनमानी केली, ते लोक माझा पराभव झाल्यावर, माजी मंत्री पिचड यांनी काय केले, असे विचारत आहेत. तालुक्यात जलाशय बांधल्याने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्यातून ऊसनिर्मिती झाली. कारखाना उभारला हे विरोधकांना दिसत नाही का? विद्यमान लोकप्रतिनिधींनी अडीच वर्षांत काय दिवे लावलेत, असा सवाल त्यांनी केला.

या मेळाव्याला माजी आमदार वैभव पिचड, इंदोरी गटातील उमेदवार प्रकाश नवले, आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, सी. बी. भांगरे, सुरेश भांगरे, दिनेश शहा, भरत घाणे, सुरेश गभाले, विजय भांगरे, पांडुरंग खाडे, राजू पिचड, तुकाराम खाडे, संतोष बनसोडे, गणपत देशमुख, गोकुळ कानकाटे, चंद्रकांत गोंदकर, पांडुरंग भांगरे, गंगाराम धिंदळे, सुनील सारुक्ते उपस्थित होते.

विरोधकांचे नेते कोण?

गोरक्ष परते यांनी अगस्ती कारखाना चालविणे म्हणजे दवाखाना किंवा दारूचे दुकान चालविणे नाही. त्यामुळे विरोधी टोळीला हद्दपार करा. प्रकाश नवले म्हणाले, की समृद्धी मंडळाचे नेतृत्व किती जण करतात व त्यांचा अध्यक्ष कोण, या प्रश्नांची उत्तरे तुम्हीच शोधा. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT