Manoj Jarange Patil-Chhagan Bhujbal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : 'भुजबळांना दंगल व्हावी असे वाटते', मनोज जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप

Rahul Gadkar

Manoj Jarange Patil News : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आज (शुक्रवारी) शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे-पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केला.

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला आणि भुजबळांना राज्यात दंगल व्हावे, असे वाटते. पण तसे होणार नाही. आम्ही होऊ देणार नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहील. हे राज्य आमचं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीमध्ये म्हणाले, मी सरकारला आता विनंती करून सांगतो. नाहीतर सगळे उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडतील. तसेच पावसाने, पुराने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली.

आंबेडकरांना उत्तर देणार नाही

निवडून येण्यासाठी ते रॅली काढली. त्यांना जनतेचे प्रश्न नको त्यांना खुर्ची पाहिजे, असे म्हणत मनोज जरांगेपाटील यांनी आपण प्रकाश आंबेडकर यांना उत्तर देणार नाही. त्यांचा मी आदर करतो. ते वंचित गरजवंतांच्या बाजुने यावेत म्हणून त्यांना हाक मारली, असे देखील जरांगे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT