MLA Kapil Patil
MLA Kapil Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार कपिल पाटील म्हणाले, खोटा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांना विरोध करा...

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : शिक्षकभारती संघटनेचा मेळावा आज अहमदनगर येथील नंदनवन लॉनमध्ये शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या प्रसंगी आमदार कपिल पाटील यांनी देशातील शिक्षण पद्धतीपासून ते बेरोजगारी पर्यंत अनेक विषयांवरून केंद्र सरकारवर टीका केली. MLA Kapil Patil said, oppose books that tell false history ...

यावेळी विधान परिषद सदस्यत्वाची पंधरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार पाटील यांचा तसेच आदर्श शिक्षक पुरस्काप्राप्त शिक्षकांचा सत्कार राज्य प्राथमिक शिक्षक भारती सभासद यांच्या सहकार्यातून करण्यात आला. राष्ट्रसेवा दलाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव कोकाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे, जिल्हा सरचिटणीस सुनील मते, महिला अध्यक्षा उषाताई येणारे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राज्य सरचिटणीस भरत शेलार, उपाध्यक्ष किशोर कदम, विनोद कडव, पप्पू मुलानी, शिवाजीराव खुडे, सुर्यभान काळे, प्रकाश दाने, स्वाती बेडभर, मंगेश भांगरे, चांगदेव काकडे, हिरा गाडे, शोभा वाणी आदी उपस्थित होते.

कपिल पाटील म्हणाले, पुस्तके बदलून खोटा इतिहास सर्वांसमोर मांडण्याचे कारस्थान देशात सुरू आहे. त्यामुळे शाळांमध्ये आता शिक्षकांनाही खोटा इतिहास शिकविण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे असा खोटा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांना जोरदार विरोध करा, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. तरुणांच्या नोकऱ्यांचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाचे दर भरमसाठ वाढले आहेत. महागाईच्या प्रश्‍नावरून लक्ष विचलित करण्यासाठी जाती-धर्माचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. पुढील काळात तरुणांच्या रोजगारासाठी योजनाबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नगर जिल्हा शिक्षक बॅंकेची निवडणूक शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी लढवावी. परंतु, त्यासाठी स्वतंत्र मंडळ तयार करावे, असेही त्यांनी सुचविले.

काही शिक्षकांना मोठा पगार तर काहींना तुटपुंजा पगार अशी शिक्षकांमधील विषमता दूर करण्यासाठी शिक्षक भारती पाठपुरावा करीत आहे. विनाअनुदानित हा शब्द कायमचा रद्द करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांना नियमीत पगार सुरू झाला पाहिजे, यासाठी शिक्षक भारतीने लढा पुकारला आहे. प्रश्‍नांची सोडवणूक होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही आमदार कपिल पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात बालभवन केंद्र

अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रसेवा दल व सत्यशोधक चळवळींचा बालेकिल्ला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बालकांवर देशभक्तीचे संस्कार रुजवावेत, यासाठी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक भरतीचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे यांच्या कल्पनेतून साने गुरुजी बालभवन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT