Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीने चंद्रकांतदादांना डिवचले; हिमालयात जाण्यासाठी काढले ट्रेनचे तिकिट

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या (Congress) जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी हिमालयात जाण्यासाठी हरिद्वारपर्यंतचे रेल्वेचे तिकिट काढले आहे.

दोन वर्षांपूर्वी एका सभेत बोलताना चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना चॅलेंज दिले होते. ''कोल्हापूरमधून हे पळून आले आज चॅलेंज आहे आपले. ज्याला कुणाला वाटते त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा, पोटनिवडणूक लावायची, निवडून नाही ना आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या पोटनिवडणुकीत भाजपच्या (BJP) उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटील यांना डिवचत हिमालयात जाण्यासाठी रेल्वेचे तिकिट काढून दिले आहे.

दरम्यान, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर देखील चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा चॅलेंज दिले आहे. आमचे नाना कदम आले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल. मी असे म्हटले होते की मी लढलो आणि हरलो तर हिमालयात जाईन, मी अजून लढलोच नाही ना. आमचे नाना लढले. अक्षरश: तुमच्या तोंडाला फेस आला, असे पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हटले आहे की ''फुले ... शाहू ... आंबेडकरांच्या विचारांचा विजय ...कोल्हापूरची जागा जिंकली... शाहू महाराज कि जय,'' त्याच बरोबर त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा फोटो शेअर करत मी हिमालयात पोहचलो असेही म्हटले आहे.

कॉंग्रेसचे नेते सचिव सावंत यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. ''काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या तमाम कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे. बिलोली देगलूर निवडणुकीनंतर मविआ सरकारच्या पाठीशी जनता आहे हे पुन्हा दिसले. भाजपच्या दमनशाही व इडीवादाचा हा पराभव आहे. धर्मांधता आणि भाजपच्या नेत्यांचे गलिच्छ राजकारण जनतेने नाकारले,'' असे ट्वीट सावंत यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT