Ramdas Athavale, Raj Thackeray
Ramdas Athavale, Raj Thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी... रामदास आठवले

सरकारनामा ब्युरो

सातारा : राज ठाकरे यांना आताच आयोध्या आताच का आठवली, असा प्रश्न करून यापूर्वी त्यांनी कधी आयोध्येला जाण्याचा विचार केला नाही. त्यांना तेथील स्थानिक लोकांचा विरोध असल्याने त्यांनी त्यांची माफी मागावी. त्यांनी परिधान केलेले भगवे वस्त्र शांतीचे प्रतीक असल्याने त्यातून वाद पेटविणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांनी महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो विझवून टाकू. मुळात त्यांनी महाराष्ट्र पेटविण्याची अशी भाषा करू नये, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

सातारा शासकिय विश्रामगृहात मंत्री आठवले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे, राणा कुटुंबिय, आदी विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याला उत्तर भारतीयांनी विरोध केला आहे. याविषयावर भाष्य करताना मंत्री आठवले म्हणाले, उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. हिंदी भाषिक लोकांना श्री. ठाकरे यांनी विरोध करायला नको होते.

राज ठाकरे यांना आताच आयोध्या का आठवली, असा प्रश्न करून यापूर्वी त्यांनी कधी आयोध्येला जाण्याचा विचार केला नाही. त्यांना स्थानिक लोकांचा विरोध असल्याने त्यांनी माफी मागावी. त्यांनी परिधान केलेले भगवे वस्त्र शांतीचे प्रतीक आहे. त्यामुळे भगव्यातून वाद पेटविणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांनी महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही तो विझवून टाकू.

मुळात त्यांनी महाराष्ट्र पेटविण्याची अशी भाषा करून वाद निर्माण करू नये. त्याच्या मनसेच्या झेंड्यावर सगळे रंग आहेत मग त्यांनी अशी भूमिका का घेतली. वादग्रस्त बोलून नेहमी चर्चेत राहणे हे राज ठाकरे यांचे काम आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असली तरी मते मिळत नाहीत.

दानवेंच्या भूमिकेला पाठींबा...

आगामी निवडणुकीत भाजपसोबत राहून मुंबई महापालिका जिंकणार आहोत. तसेच इतर ही निवडणूका जिंकण्याचा प्रयत्न राहील. रावसाहेब दानवेंनी राज्याच्या विकासासाठी ब्राम्हण मुख्यमंत्री आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या त्यांच्या भूमिकेला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत, असे भाकित श्री. आठवले यांनी केले.

काँग्रेसने आघाडीतून बाहेर पडावे...

राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. याविषयी मंत्री आठवले म्हणाले, पटोले यांच्या पाठीत तो खंजीर आहे का, यामुळे ते रक्त बंबाळ झाले असून आता त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे. 2024 मध्ये महाराष्ट्र भाजप व रिपब्लिकन पक्षाची सत्ता आम्ही आणणार आहोत. आम्ही ज्या ज्या पक्षांसोबत जातो तेथे सत्ता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राणा कुटुंबाला पाठींबा...

राणा कुटुंबाने चालिसा म्हणण्यासाठी आंदोलन म्हणून भूमिका मांडली होती. पण राज्य सरकार व पोलिसांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तसेच त्यांना त्रासही दिला आहे. आता रिपब्लिकन पक्ष राणा कुटुंबांसोबत असून त्यांना आमचा पाठींबा असल्याचे श्री. आठवले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT