राज्यात निवडणुकीचा माहोल रंगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापुरात महत्त्वाचे विधान केले आहे. 'महायुतीमधील तिन्ही पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (आजित पवार गट) कोणत्याही परिस्थितीत एकत्रच राहणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
फडणवीस म्हणाले, 'निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. प्रत्येक पक्ष आपापल्या स्तरावर युतीबाबत निर्णय घेईल. कुठे युती झाली नाही, तरी निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ. महायुतीलाच मोठे यश मिळेल, याची मला खात्री आहे.”
मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली. अलीकडेच छत्रपती संभाजीनगर येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'चांगलं आहे, उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडले, याचा मला आनंद आहे. मात्र, ते फक्त टोमणे मारण्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत. मी आधीच सांगितले आहे त्यांनी विकासावर केलेलं एक भाषण दाखवा, आणि मी हजार रुपये देईन,” असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेलाही फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यांना एकाच उत्तर हवे आहे, ते म्हणजे निवडणुका पुढे ढकलने. त्यांना दुसरे कोणतेही उत्तर अपेक्षित नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही. असेही फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.