MLA Balasaheb Patil, CM Eknath Shinde
MLA Balasaheb Patil, CM Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : सरकारला धोका असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होत नाही : बाळासाहेब पाटील

Umesh Bambare-Patil

Balasaheb Patil News : मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्यामुळे कोणत्याही विभागाला सध्या न्याय मिळत नाही. मंत्रिमंडळ विस्तार केल्यावर नाराजी पसरली तर सरकारला धोका असल्याच्या कारणामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याची टीका माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी केली.

चोराडे (ता. खटाव) येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन, सोसायटी पदाधिकाऱ्यांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील, भाग्यश्री भाग्यवंत, जितेंद्र पवार, सुरेंद्र गुदगे, सुहास पिसाळ, सरपंच कृष्णत पिसाळ, उपसरपंच सुधाकर कुंभार, अध्यक्ष नारायण पिसाळ

आमदार पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने जी विकास कामे केली त्यांना स्थगिती देण्याचे काम सध्याच्या सरकारने केले. त्यांचे हे वागणे लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे. हे सरकार सर्वसामान्यांचा द्वेष करणारे आहे.

सत्तेवर आलेल्यांनी राज्यातील प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले पाहिजे. या सरकारच्या माध्यमातून लोकशाही कोणत्या मार्गाने चालली आहे. याचा आपण विचार करावा. येणाऱ्या काळातील निवडणुकांसाठी सर्वांनी एकजुटीने सज्ज राहावे.

सारंग पाटील म्हणाले, मतदारांच्या विकास कामाच्या कितीही अपेक्षा वाढल्या तरी, त्या पूर्ण करण्यास खासदार, आमदार कधीही मागे हटणार नाहीत. सहा महिन्यांपूर्वी घडलेले सत्ता नाट्य मतदारांना आवडलेले नाही. कऱ्हाड उत्तर मतदारसंघाने नेहमीच लोकसभा व विधानसभेत चांगल्या विचारांची पाठराखण केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT