Prithviraj Chavan, Narendra Modi
Prithviraj Chavan, Narendra Modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : देशात अराजकतेचे राजकारण; मोदी सरकारकडून द्वेषाची पेरणी : चव्हाण

सरकारनामा ब्युरो

Karad News : सध्याचे केंद्रातील सरकार जुनी जातीयव्यस्था आणून लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण केली जात आहे. देशात सध्या अराजकतेचे राजकारण सुरू असून मोदी सरकारकडून Modi Government भावा-भावात गावागावात द्वेषाचे विष पेरले जात आहे. समता, बंधुत्व, स्वातंत्र्य या त्रिसुत्रीला तिलांजली देण्याचे काम मोदी सरकार करत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी केली.

कोपर्डे हवेली येथे कऱ्हाड उत्तर काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या हात से हात जोडो अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी कोपर्डे हवेलीचे ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ चव्हाण, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जाधव, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, भानुदास माळी, काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मोदी सरकारची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे. खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे देशाच्या संपत्तीची विक्री सुरू आहे. गेल्या पंचेचाळीस वर्षात सर्वाधिक बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात झाली आहे, या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठीच हात से हात जोडो अभियान सुरू केले आहे.

निवासराव थोरात म्हणाले, देशाची एकता अखंड रहावी, यासाठी राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा पूर्ण केली. महागाई, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला जनतेच्या प्रश्नांचा विसर पडलेला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT