Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

त्यांनी आता काय डोंगर, काय हॉटेल, काय झाडी एवढचं म्हणत बसावं...

अमित आवारी

Balasaheb Thorat : देशात काँग्रेसतर्फे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आझाद गौरव यात्रा होत आहे. संगमनेर तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद गौरव यात्रा झाली. या प्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर टीकेची तोफ डागली.

राज्यातील नवीन मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप केले. या खाते वाटपावरून शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, शिंदे गटाला वाटलेली खाती पाहून वाटते की त्यांच्या हाती फक्त डोंगर, हॉटेल, झाडी तेवढच राहिल्याचे दिसते. त्यांनी आता काय डोंगर, काय हॉटेल, काय झाडी एवढचं म्हणत बसावं अशी स्थिती आहे. त्यांचं सारं ओके झालं. काही जण मंत्री झाले म्हणून मोकाट सुटले आहेत. वाटेल ते आरोप करत आहेत. होऊ द्या! चार दिवसांनी सर्वोच्च न्यायालय काय करते हे सांगता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

ही सत्ता फार काळ चालणार नाही. मंत्रीमंडळ बनवायला 40 दिवस, त्यानंतर खाते वाटायला 10 दिवस. 50 दिवस यातच गेले. खाते वाटल्यावर काय चालले आहे. हे मला माहिती आहे. आता आम्हालाच फोन येतात. काय करू झाले आमच्या कडून. तुमचेच भांडणे चालली तर जनतेचे प्रश्न सोडविणार केव्हा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्य व देश पातळीवर राजकीय विचार सर्वांना समजावून सांगणे गरजेचे आहे. देशात सोन्याचे दिवस व सोनियाजींचे दिवस आणणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT