vishal patil manoj jarange patil
vishal patil manoj jarange patil  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil : "फडणवीस सरकारनं जरांगेंना त्रास दिला अन् मी खासदार झालो", विशाल पाटील असं का म्हणाले?

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीत महायुतीला जरांगे 'फॅक्टर'मुळे दणका बसला होता. '45 पार'चा नारा देणाऱ्या महायुतीचं गणित '17' जागांवरच फिस्कटलं. महाविकास आघाडीला अपक्ष विशाल पाटील यांच्यासह '31' जागांवर यश मिळालं. यातच खासदार विशाल पाटील यांनी सांगली विजय कसा झाला याबाबत भाष्य केलं आहे.

"फडणवीस सरकारनं मनोज जरांगे-पाटील यांना त्रास दिला. त्या त्रासाचा बदला समाजानं घेतला आणि मी खासदार झालो," असं विधान विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी केलं आहे. ते मिरजेत एका सत्कार समारंभात बोलत होते.

विशाल पाटील म्हणाले, "मराठा ( Maratha ) समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना फडणवीस सरकारनं त्रास दिला. त्या त्रासाचा बदला समाजानं लोकसभा निवडणुकीत घेतला आणि मी खासदार झालो."

"विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून येतील. वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा," असं मोठं विधान विशाल पाटील यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT