Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharastra live Update : 'आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे, नाक घासलेलं आहे, आता फार विषय ताणू नये'

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 27 Jan 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी अर्ज करण्यासाठीची दोन दिवसांची मुदत आजपासून सुरु होत आहे. राज्यमंत्रीमंडळाची बैठकही होणार आहे. या घडामोडींबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचे अपडेट्स वाचा

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut : 'आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे, नाक घासलेलं आहे, आता फार विषय ताणू नये'

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यांच्या भाषणावर आक्षेप नोंदवणाऱ्या वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल, तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. भारत प्रजासत्ताक झाला, अशा वेळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे हे सत्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचे देखील कौतुक करतो. पण, आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे. नाक घासलेलं आहे. आता फार विषय ताणू नये.'

Nandurbar Rain : अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहर गळला, नंदूरबारमधील शेतकऱ्यांना मोठा फटका

काल रात्री नंदुरबार इथं झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठं नुकसान झालं. सातपुडा पट्ट्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे काही दिवसापूर्वी मोहरांनी बहरलेली आंब्याची मोहर जमिनीवर घडून पडला. यामुळे आंब्याचे मोहर गळून पडल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. याशिवाय रब्बी हंगामातील गहू, पपई आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल गेल्या महिन्याभरापासून ढगाळ वातावरण आहे.

Dombivli Crime : डोंबिवलीत अन्न व औषध प्रशासन मोठी कारवाई, बनावट औषध कंपनीवर छापा, पाच जणांना अटक

डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या बनावट औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे औषध बनावटगिरीचा मोठा पर्दाफाश झाला असून शहरासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Solapur ZP Election : पवारांना धक्का, ऐनवेळी जिल्हा परिषदेतून ढवळे यांची माघार

माढ्यात पंचायत समितीच्या माजी सभापती यशोदा ढवळे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेनेच्या उमेदवार सविता कोकाटे यांना पाठिंबा दिला आहे. यशोदा ढवळे यांनी बेंबळे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी ढवळे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Girish mahajan nashik : मंत्री महाजनांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा

प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी आक्षेप घेतला होता. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव भाषणाच्या दरम्यान का घेतलं नाही, असे म्हणत या महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला. माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनीही माधवी जाधव यांच्याशी फोनवरुन संवाद साधल माहिती जाणून घेतली.

Kisan Sabha Morcha : मंत्री महाजनांची शिष्टाई निष्फळ, किसान सभेचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना

आदिवासींना वनहक्क कायद्याअंतर्गत हक्क मिळावेत, वनजमीन आणि गायरान जमिनीचे स्वतंत्र सातबारा उतारे देण्यात यावेत, तसेच विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने नाशिक ते मुंबई असा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. नाशिकच्या वेशीतून मोर्चा ठाण्याच्या दिशेने सरकत असताना कुंभमेळा मंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते. मोर्चा पुढे नेऊ नये, आंदोलनकर्त्यांनी सध्या जिथे आहेत, तिथेच थांबावे आणि सरकारसोबत चर्चा करावी, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली. मात्र, ही शिष्टाई अपयशी ठरली असून, सरकारची विनंती झुगारत मोर्चा सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.

नाशिकच्या तपोवनमधील झाडं राहणार की तोडणार याबाबत आज न्यायालयात सुनावणी आहे. तपोवन वृक्षतोड प्रकरणी होत असलेल्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. अॅड नितीन पंडित यांनी तपोवन येथील वृक्षतोडी प्रकरणी दाखल केली आहे. न्यायाधीश चंद्रशेखर व गौतम अखंड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

Mumbai live: किसान सभेचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना

किसान सभेचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे, शिष्टमंडळाच्या सदस्याची सरकारसोबत चर्चा होणार असून मोर्चो आज ठाण्यात धडकणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही . याबाबत माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला आहे, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT