<div class="paragraphs"><p>Narayan Rane-Nitesh Rane</p></div>

Narayan Rane-Nitesh Rane

 

Sarkarnama 

महाराष्ट्र

ज्यांच्यावरून राणे कुटंबीय अडचणीत आले ते सतिश सावंत चिठ्ठीवर पराभूत

सरकारनामा ब्यूरो

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेसाठी (Sindhudurg District Bank Election) चुरशीने मतदान तसेच निकालही आले. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत (Satish Sawant) हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप दोघांमध्ये चुरस होती. कणकवली येथे सतिश सावंत यांचा पराभव नशिबाचा कौल ठरला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा ठरला.

सतिश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंचरच नितेश राणे अडचणीत आले होते. त्यामुळे सावंत यांचा पराभव भाजप आणि राणेंसाठी महत्वाचा होता. सावंत यांचा पराभव करून विठ्ठल देसाई हे विजयी झाले. राणे आणि सावंत या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीवर देसाई हे विजयी झाले. या निवडणुकीत आतापर्यंत महाविकास आघाडीला चार आणि भाजपला चार जागा मिळाल्या.

जिल्हा बँकेसाठी कणकवली तालुक्यात १६५ पैकी १६१ इतके मतदान झाले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मतदार असलेले संदेश उर्फ गोठ्या सावंत यांची दोन मते, बेपत्ता असलेले विकास संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर आणि आजारी असलेले सुरेश सावंत असे चार मतदार मतदानाचा हक्क बजावू शकलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेबरोबरच कणकवली विकास संस्थेवर कोण बाजी मारणार याची प्रतीक्षा होती. मतदानावेळी केंद्रावर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्यात बाचाबाची झाली. मतदानानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून घोषणाबाजी केल्याने भाजप शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने घोषणा बाजी देत होते. मात्र, काही वेळेतच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना बुथावरून पांगवण्यात आले. त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. बँकेच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाले. कणकवली हे संघर्षाचे केंद्र बनले होते. त्यामुळे कणकवलीत काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. या मतदारसंघातील विकास संस्थेमधून विद्यमान बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत विरुद्ध संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई अशी लढत होती. यासाठी एकूण ३६ मतदार होते; मात्र तळेरे संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. ते काल मतदान केंद्रावर पोचू शकले नाहीत. त्यामुळे या मतदारसंघात केवळ ३५ इतकेच मतदान झाले. मजूर सहकारी संस्थेचे संदेश सावंत तसेच एका मंडळाचे मतही त्यांच्याकडे होते. याचबरोबर शिक्षण संस्थेचे मतदार असलेल्या सुरेश शांताराम सावंत हे आजारी असल्याने मुंबईतून मतदानासाठी पोचू शकलेले नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT