ST workers
ST workers Sarkarnama
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला इशारा अनिल परब दुसऱ्याच दिवशी खरा करणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पुन्हा सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. राज्य सरकारने काल न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे अध्यादेश काढून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी समिती स्थापन केली असून कालच समितीची पहिली बैठकही पार पडली. मात्र त्यानंतरही एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करा या मागणीवर कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला आता महामंडळानेही कर्मचाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने समिती स्थापन केल्यानंतर संप मागे मिटण्याची अपेक्षा सरकारला आणि महामंडळला होती. मात्र, २०१७ प्रमाणेच समितीचे गाजर दाखवून संप मोडीत काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे समितीचा निर्णय मान्य नसून संप कायम ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आजही पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर यासह राज्यातील मोठ्या आगारांमधून एसटी वाहतूक सुरु होवू शकलेली नाही. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आता राज्य परिवहन महामंडळाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाविरुद्ध अवमान याचिका दाखल केली जाणार आहे. न्यायालयाने काम बंद आंदोलन करू नये असे सांगितले असतानाही संप सुरु आहे. त्यामुळे महामंडळाकडून मंगळवारी दुपारी न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात येणार आहे. कालच परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतचे सुतोवाच केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT