Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं. यापार्श्वभूमीवर अनेक बड्या राजकीय नेत्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला तसंच श्रद्धांजली वाहिली. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी ट्विटद्वारे अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.
रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्रच्या पुरोगामी गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला. आज माझं मन खूप हेलावलं आहे. अजित पवार म्हणजे राजकारणातला एक 'पॉवरफुल' नेता, ज्यांच्या शब्दाला वजन होतं आणि निर्णयाला धार होती. दादांचा प्रशासकीय धडाका आणि वेळेचं पालन हे सर्वांसाठीच आदर्श होतं, ते स्पष्टवक्ते होते. मनात काहीही न ठेवता जे आहे ते तोंडावर बोलायचे, अशा या रोखठोक नेत्याचं जाणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत आहे.
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा गड आहे आणि या गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला आहे. दादांनी नेहमीच दलित, कष्टकरी आणि वंचितांच्या प्रश्नांवर आपली ठोस भूमिका मांडली. रिपब्लिकन चळवळीबद्दल त्यांच्या मनात नेहमीच आपुलकी होती. सत्तेत असो वा विरोधात, त्यांचा शब्द हा अंतिम असायचा. त्यांच्या कार्याचा वारसा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. मी माझ्या पक्षातर्फे आणि वैयक्तिकरित्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.