नसरापूर येथील पीडित मुलीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांनी आपल्याला भेटायला येऊ नये, असे स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझ्या मुलीला जो पर्यंत न्याय मिळत नाही, जो पर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तो पर्यंत कुटुंबाला भेटायला येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा हे आज अनेक दिवसांनंतर दिल्लीत दाखल झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून खेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती.
नसरापूर घटनेच्याविरोधात विविध राजकीय पक्ष, संघटना आक्रमक झाले आहे. खेड शिवापूर टोलनाक्यावर संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी टायरही जाळले, त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी व शिवणी तांडा परिसरात अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने छापे टाकत रसायनमिश्रित हातभट्टी दारू आणि बनावट सिंधी निर्मिती अड्ड्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत हजारो लिटर शरीरासाठी अत्यंत घातक असलेली हातभट्टी दारू आणि शिंदी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जाणवत असलेल्या पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण झाली होती. अनेक पंपावर पेट्रोल डिझेल नो स्टॉकचे फलक लावले होते. मात्र आज सकाळपासून पेट्रोल पंपावर सुरळीत सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर इंधनपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झाला असून ‘नो स्टॉक’चे फलक हटवण्यात आले आहेत.
छत्तीसगड राज्य माओवादमुक्त झाल्याच्या अधिकृत घोषणेला काही दिवस उलटत नाहीत तोच, नक्षलवाद्यांनी पेरलेले आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात डीआरजीच्या (जिल्हा राखीव दल) चार जवानांनी प्राण गमावले. छत्तीसगडच्या कांकेर-नारायणपूर सीमावर्ती भागात 2 मे रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. याचबरोबर केंद्र सरकारच्या नक्षलमुक्तीच्या घोषणेला धक्का बसला आहे.
भोंदू अशोक खरात नवव्या गुन्ह्यात चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. भोंदू खरातने फिर्यादी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यास अवतार पूजा करायची आहे, असे सांगून चार ते पाच कोटी रुपये या गुन्ह्यात उकळले. याशिवाय परिसराची शक्ती प्राप्त करण्याकरिता 21 देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करील त्यात तुझा मृत्यू होईल, अशी भीती घालून 21 देशांमध्ये मौजमजा करून आला. एवढेच नव्हे तर मृत्यूची भीती दाखवून जासूदची कार स्वतःच्या नावावर करून घेतली.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून दुसऱ्या दिवशीही कलिंग ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत पशुसंवर्धन विभागाच्या 50 कर्मचाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 44 हजार कोंबड्या, 20 हजार अंडी आणि तब्बल 44 टन पशुखाद्य नष्ट केले आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने कोंबड्यांचे कलिंग केले जात असून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत टरबूज खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आल्याने अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित मुलीचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले ब्रीजवर रास्ता रोको आंदोलन केले. पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर लाठीमार करत आंदोलकांना नवले पुलावरून पांगवले आणि हा रस्ता मोकळा केला. मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही लाठीचार्ज झालाच नसल्याचे म्हटले आहे.
नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिलीय. कबुलीमुळे आता या नराधमाला कठोर शिक्षा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय...
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झालीय.. शनिवारी झालेल्या छाननीत भाजपचे 5, शिंदेसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि ठाकरेसेना 1 अशा नऊ प्रमुख उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नसरापूर घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली होती. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स यांना या प्रकरणाची दखल घेऊन तपासावर देखरेख ठेवण्याचे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आयोगाकडून आवाहन करण्यात आले आहे. वेळेत आरोपपत्र दाखल करणे आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद सुनावणी सुनिश्चित करण्यावरही आयोगाकडून भर देण्यात आला आहे.
आज रविवार दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता, विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे या नसरापूर घटनेतील पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी धायरी येथील DSK विश्व या ठिकाणी जाणार आहेत.
चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त नागरिक शनिवारी रात्री रस्त्यावर उतरले होते. त्यांनी तीन तास रस्ता रोको केला. आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली. चिमुरडीवरील अन्यायाविरोधात आज संपूर्ण भोर, राजगड तालुका बंद ची हाक देण्यात आली आहे. व्यापारी आणि दुकानदारांनीही आपली दुकाने बंद ठेवून या निषेधात सहभाग नोंदवण्याचे आवाहनहवेली, भोर वेल्हा मधील आंबेडकरी संघटनांच्या वतीने खेड शिवापूर टोल नाका बंदची हाक दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.