Arun Gujrathi News Rahul Narwekar
Arun Gujrathi News Rahul Narwekar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Arun Gujrathi News : 'अध्यक्षांच्या अविश्वास ठरावावर चर्चेचा अधिकार विरोधी पक्षाचाच!'

सरकारनामा ब्यूरो

Arun Gujrathi News : राज्याचे विधानसभा अध्यक्ष यांच्यावर विरोधी पक्षाने जो अविश्‍वास ठराव आणला आहे, तो त्यांचा अधिकार आहे. ठराव सभागृहात चर्चेला घ्यायचा की नाही, याचा अधिकार विरोधी पक्षाचा असतो, असे मत महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी ‘सरकारनामा’शी बोलतांना व्यक्त केले.

राज्याचे विधानसभा अध्यक्ष यांच्यावर विधानसभेतील विरोधीपक्ष कॉंग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. या ठरावावर एकूण ४८ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या ठरावाचे पुढे काय होणार याबाबत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्याकडून सरकारनामाने मत जाणून घेतले.

गुजराथी म्हणाले, विधानसभा अध्यक्षावर विरोधी पक्षाने अविश्‍वास ठराव आणलेला आहे. तो त्यांचा अधिकार आहे, तो ते आणू शकतात, माझ्यावरही दोन वेळा विरोधी पक्षांनी अविश्‍वास ठराव आणला होता. विरोधी पक्षाने आणलेला अविश्‍वास ठराव काही वेळा राखून ठेवला जातो, त्याची अमंलबजावणी होईलच अशातला भाग नाही. ठराव आणल्यानंतर ज्यांनी ठराव आणला ते लोक सभागृहात उभे करावे लागतात. तेव्हा तो ठराव होतो.

पुढे ते म्हणाले, हा ठराव चर्चेला घ्यायचा की नाही तो निर्णय विरोधी पक्षातील लोक ठरवितात, तो त्यांचा अधिकार आहे. तो अधिकार त्यांनी का वापरला, त्याची कारणे तेच सांगू शकतील. बहुमत असेल तर ठराव पारीत होईल, अन्यथा व्हीप काढून सर्व लोक हजर करतात,मतदानावर चर्चा होते. मतदानाची वेळ आली तर दरवाजे बंद होतात, मग गणना केली जाते, असे गुजरातींनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT